शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

मंचाऐवजी शेतकऱ्यांसमवेत बसून राहुल गांधी यांनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:10 IST

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे मंच सोडून बॅरिकेट ओलांडून थेट शेतक-यांमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेवाईक संवाद साधला.

परभणी, दि. 8 - पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे मंच सोडून बॅरिकेट ओलांडून थेट शेतक-यांमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेवाईक संवाद साधला. त्यामुळे एरंडेश्वरच्या शेतकरी संवाद कार्यक्रमाला एक भावनिक स्वरूप प्राप्त झाले होते. शेतक-यांनी मन मोकळा संवाद साधत राज्य शासनाविषयी संताप व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ८ सप्टेंबर रोजी एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०० शेतकरी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छोटेखानी मंचही उभारला होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. दुपारी २.०५ वाजता खा.राहुल गांधी यांचे एरंडेश्वर येथे आगमन झाले. सुरुवातीलाच १३ शेतकºयांनी खा.गांधी यांचा सत्कार केला. त्यानंतर खा.गांधी मंचावर पोहचले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस बाला बच्चन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांची उपस्थिती होती. 

खा.अशोक चव्हाण यांनी अवघ्या पाच मिनिटांचे प्रास्ताविक केल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी शेतक-यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहन केले. एरंडेश्वर येथील शेतकरी बालासाहेब काळे यांनी शेतक-यांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफीच्या अर्जांसाठी अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवा जी.आर. निघत असून नवीन कर्ज मिळत नाही. जुन्या कर्जांची माफी होत नाही, या परिस्थितीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे सांगितले. बालासाहेब काळे हे समस्या मांडत असतानाच खा.राहुल गांधी अचानक मंचावरुन उठले, सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या लाकडी कठड्यामधून थेट समस्या मांडणाºया शेतक-यांमध्ये येऊन चक्क मांडी घालून ते बसले. त्यानंतर शेतक-यांचा उत्साह आणखीच वाढला. एक-एक करीत शेतकरी गा-हाणे मांडत होते. काँग्रेसचे गट निरीक्षक तथा एरंडेश्वरचे रहिवासी असलेले प्रा.व्यंकटराव काळे, अण्णासाहेब काळे, राजू काळे आदींनी खा. राहुल गांधी यांच्यासमोर शेतकºयांच्या समस्या मांडल्या. राज्य शासनाकडून अडवणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी खा.राहुल गांधी यांनी शेतक-यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात तातडीचे दहा हजार रुपये मिळाले का, गावाची लोकसंख्या किती आहे आणि किती जणांना कर्जमाफी झाली, असे प्रश्न करताच गावक-यांनीही एकालाही कर्जमाफी मिळाली नाही, असे सांगितले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी केंद्र शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असून संपूर्ण कर्जमाफी देण्यास शासनाला भाग पाडू, असे अभिवचन शेतक-यांना दिले. याच ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलाही उपस्थित होत्या. शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.  खा.गांधी यांनी ३५ मिनिटे शेतक-यांशी संवाद साधला. या संवादात राज्य शासनाच्या धोरणांपासून ते सध्याची पीक परिस्थिती, पिकांना मिळणारा भाव, शेतक-यांच्या आत्महत्येची कारणे अशा विविध मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. 

राहुल गांधी म्हणाले 

गुजरात राज्यात नॅनो कार प्रकल्पासाठी एका उद्योजकाला ६५ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते आणि कर्ज दिल्यानंतरही नॅनो कार मात्र दिसत नाही. या उलट महाराष्ट्रातील शेतकरी अनेक समस्यांनी वेढला असताना त्यांना कर्ज दिले जात नाही, ही समस्या गंभीर आहे. आम्ही ‘मन की बात’ नाही तर ‘दिल की बात’ करणारे सरकार आणू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

भाजप सरकारच्या निर्णयांमुळे व्यापारी, शेतकरी, मजूर आणि सर्व सामान्य नागरिकही आर्थिकदृष्ट्या कचाट्यात सापडला. सुरुवातीला कॅशलेस व्यवहाराचे आवाहन करीत नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण देश रांगेत उभा राहिला. या निर्णयाने देशाला आर्थिक नुकसान पोहचविले. त्यानंतर काळे धन परत आणू असे आमिष दाखवून ९९ टक्के काळा पैसा पांढरा करुन घेतला. अलीकडेच जीएसटी कायदा देशभरात लागू केला असून या कायद्याने व्यापाऱ्यांंना देशोधडीला लावले आहे. बोटावर मोजण्याइतक्या उद्योगपतींचे भले करण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे, असा आरोप करीत काँग्रेस हा शेतक-यांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची भाषा समजतो. शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असून संपूर्ण कर्जमाफीसाठी या शासनाला भाग पाडू, असे राहुल गांधी म्हणाले.