शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

DCM होण्यास एकनाथ शिंदे कसे तयार झाले? १२ दिवसांत काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:19 IST

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट मोकळी करून दिली असली तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. अखेरीस ते कसे तयार झाले, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला.

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथबद्ध केले जाणार आहे.

राजभवनावर जाऊन महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, यावर एकनाथ शिंदे यांचे एकमत होते नव्हते. शपथविधी सोहळ्याला काही तास राहिले असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांची मनधरणी केली. शपथविधी सोहळ्यानंतर अमित शाह यांच्याशी बैठक होण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर मानापमान नाट्यावर पडदा पडला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. विधानसभा निकाल लागल्यानंतर १२ दिवसांमध्ये महायुतीत मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय घडले, ते सांगितले.

उपमुख्यमंत्री होण्यास एकनाथ शिंदे कसे तयार झाले? १२ दिवसांत काय घडले?

एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासह महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार नव्हते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, निकालानंतर महायुतीच्या पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी समर्थन दिले होते. मात्र त्यानंतर शिंदेंनी सरकारमध्ये न जाता समन्वय समितीचे प्रमुख पद घ्यावे आणि महायुतीचा कारभार व्यवस्थित हाकण्यावर देखरेख करावी, असा सल्ला काही शिवसेनेच्या नेत्यांनी दिला होता. शिवसेनेच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आपल्याचा पक्षाचा व्हावा, असे वाटत होते. माझे आणि एकनाथ शिंदेंचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, २०१९ सालीही भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले होते. तरीही २०२२ साली एकनाथ शिंदेंना मुख्यंमत्री केले. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उठाव करत मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मला वाटते की, त्यावेळी शिंदेंनी मोठी जोखीम उचलली होती. कारण असे निर्णय कधी कधी तुमचे राजकारण संपवू शकतात. त्यामुळेच मीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव देऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे. कारण शिंदेंना मुख्यमंत्री केले तर त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना आत्मविश्वास मिळेल. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सर्व काही सांगता आले नाही. पण यावेळी भाजपाचे संख्याबळ प्रचंड असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद देता आले नाही. कारण असा निर्णय घेतला असता तर देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा संदेश गेला असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. ते इंडिया टुडेच्या मुलाखतीत बोलत होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती