शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंगची चौकशी, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती देणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:22 IST

विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६-१७ या काळात ते खासदार असताना राज्यात त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई :  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहविभागाने त्याबाबतचा आदेश शुक्रवारी काढला.विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६-१७ या काळात ते खासदार असताना राज्यात त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. प्रत्यक्षात आज काढलेल्या आदेशात २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या फोन टॅपिंग प्रकरणांची चौकशी केली जाईल. तसेच, या कालावधीत अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले होते का याचा तपास केला जाईल व तसे आढळल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे म्हटले आहे.पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करेल. समितीमध्ये आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा), मुंबई हे सदस्य असतील. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात याबाबतची सर्व वस्तुस्थिती मांडली जाईल, असेही गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस