शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राज्यात कोरोना पाठोपाठ टोमॅटो पिकावरही परदेशी विषाणुजन्य रोगाचे संक्रमण; शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:14 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रोगाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देटोमॅटोवरती स्पॉटेड विल्टव्हायरस, तिरंगा, बोकडय़ा, पिवळा लिफकर्ल, मोझँक हे विषाणुजन्य रोगराज्यात पुणे सोलापूर, सातारा,नाशिक, नगर या भागात सुमारे चार हजार हेक्टरवर टोमॅटोचे पीक लॉकडाऊन कालावधीत हा प्रसार झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण

सतीश सांगळे कळस : राज्यात कोरोना संसर्ग फैलावामुळे शेती अडचणीत आली  असतानाच टोमॅटो पिकावर परदेशी विषाणूजन्य रोगाचे संक्रमण झाल्याने  पीकच नेस्तनाबूत होण्याची भीती व्यक्त होत आहे .मात्र , सदर रोगाचे निदान व उपाययोजना करण्यास विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .

राज्यात पुणे सोलापूर, सातारा,नाशिक, नगर या भागात सुमारे चार हजार हेक्टरवर टोमॅटोचे पीक घेतले जाते. राज्यात टोमॅटो हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कमी कालावधीचे हे पीक घेतले जाते .मात्र, विषाणूजन्य रोगामुळे अडचणीत आले आहे. टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवुन त्याचा रंग बदलुन हे फळ सडत आहे. झाडावर रोग दिसत नाही. मात्र फळ वाकडे तिकडे होत आहे. हा रोग पहिल्यांदाच आला आहे.टोमॅटोवरती स्पॉटेड विल्टव्हायरस, तिरंगा, बोकडय़ा, पिवळा लिफकर्ल, मोझँक हे विषाणुजन्य रोग येतात. मात्र हा विषाणू वेगळ्या स्वरुपाचा आहे. लाल व रसरशीत असलेल्या टोमॅटोला विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे फळे सडत आहेत त्यावर रासायनिक औषधांची फवारणी करुनही  फायदा होत नाही.मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रोगाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या रोगाने थैमान घातल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या रोगावर कोणताही उपाय चालत नसल्याने शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तालुक्यातील शेळगाव, कडबनवाडी, लासुर्णे, निमगाव केतकी, रामकुंड अंथुर्णे ,भरणेवाडी, बोरी, काझड,शिंदेवाडी,परिसरात टोमॅटोचे पीक घेण्यात येते. टोमॅटोच्या रोपापासून, ते मल्चिंग पेपरवरील लागवड, झाडांना आधार देण्यासाठी तार-काठी, लागवडीची मजुरी यावर शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांच्या वर खर्च केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .या रोगावर कोणत्याही प्रकारच्या फवारणीचा उपयोग होत नाही. ढगाळ वातावरणामुळे रोग वाढत आहे .त्यामध्ये लाँकडाऊन कालावधीत हा प्रसार झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे .टोमॅटो पिकाची लागवड तीन हंगामात केली जाते .खरीप हंगामासाठी जून, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर या महिन्यात लागवड होते, मात्र तालुक्यात मार्च महिन्यात टोमॅटो लागवडीवर अधिक भर दिला जातो. या टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा मानस आहे. मात्र, आता लागवड केलेल्या टोमॅटोला चांगले दर मिळतील,  अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र , ती फोल ठरली आहे..............................

शेळगाव, कडबनवाडी या परिसरात टोमॅटोचे सुमारे १० प्लाँट आहेत. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळाचा आकार, रंग बदलून फड वाया गेला आहे .माझे दोन एकर क्षेत्रातील पिक वाया गेले आहे. दोन लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे .मात्र , विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. कृषी विभागाने पाहणी करून उपाययोजना करण्याची गरज आहे .सुनिल शिंगाडे, उत्पादक, शेतकरी ------------------------------------

तालुक्यात साधारणपणे २०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिक असते आहे .यामध्येच टोमॅटो पिक येते. मात्र , उन्हाळ्यात क्षेत्र कमी असते. टोमॅटो पिकांचा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झालेल्या टॉमेटो पिकाच्या क्षेत्राची माहिती कृषी सहाय्यकांकडुन मागवली आहे. मात्र, या विषाणुचे निदान कृषी शास्त्रज्ञ करीत आहेत .

- सुर्यभान जाधव, तालुका कृषी अधिकारी इंदापुर.

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरी