शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"गुजरातला किती उद्योग गेले याची उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढावी’’, विजय वडेट्टीवार यांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:00 IST

Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे, असे आव्हानही त्यांनी दिलं.

नाशिक - राज्यात महिला आणि बालिकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी जून पर्यंत 2147 बालिकांवर अत्याचार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महिला आणि बालिका मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत, अशा वेळी हे महाविनाशी सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीका विधानसभा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे, असे आव्हानही त्यांनी दिलं.

नाशिक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर  विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराची चिरफाड करत सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.  विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेत लोकांनी महायुती सरकारला नाकारले म्हणून महायुतीने लाडकी बहिण योजना आणली. येत्या विधानसभा निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी महायुतीचा हा प्रयत्न आहे. खरं तर पंधराशे रूपयांपेक्षा माता-भगिनीं, चिमुकल्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी अशा योजना आणल्या जात आहेत. जनता या महाविनाशी सरकारला विटली असून या महाविनाशी सरकारची नितीमत्ता भ्रष्ट झाली असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.  बेशुद्ध महायुतीला शुद्धीवर आणण्यासाठी येत्या 24 तारखेचा बंद यशस्वी करा, असे आवाहन करत हा बंद राजकीय नसल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला आता अस्थिर केले जात आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व संपवण्याचे काम महायुती सरकार पद्धतशीर करत आहे. एकमेकांच्या धर्माबद्दल अपशब्द बोलून दंगली पेटवल्या जात आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती