शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

देशातील कांद्याची निर्यात मालदीवला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 5:14 AM

केंद्राचा निर्णय : मात्र २० हजार क्विंटलची मर्यादा

नाशिक : देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमी होत असतानाच केंद्र सरकारने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्याचे ठरविले आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी तसा आदेश काढला आहे.देशात वेगाने दर वाढत असल्याने सप्टेंबरच्या अखेरीस केंद्राने कांद्याची निर्यातबंदी केली आणि कांद्याची आयात करणे सुरू केले. दरम्यानच्या काळामध्ये कांद्याचे पीक आल्याने पुरवठा वाढून त्याचे दरही काहीसे कमी झाले. त्यामुळे सरकार व ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या बाजारपेठांत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे दर कमी होत असून केंद्राने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.त्यामुळे केंद्राने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्यास संमती दिली असून, तो तामिळनाडूच्या तुतीकोरीन बंदरामधून पाठवला जाणार आहे. सन २०१९-२०च्या कोट्यामधून मालदीवला ही निर्यात केली जाणार आहे. या निर्यातीसाठी घालून दिलेल्या कोट्यावर तुतीकोरीनचे कस्टम खाते लक्ष ठेवेल. मालदीवमध्ये कांदा काय दराने विकणार, त्याची खरेदी-विक्री कोण करणार, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्याचा दोन हजार रुपयांचा दर आणि तुतीकोरीनपर्यंत क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपये वाहतूक खर्च आणि निर्याती खर्च याचा विचार करता हा व्यवहार किती फायद्याचा राहील, याबाबत तज्ज्ञांना आहे.निर्यातीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अंशत: का होईना निर्यात होणार असल्यामुळे बाजारपेठांमध्ये विक्रीस येणाऱ्या कांद्याच्या दरात भविष्यात काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केंद्राने दिलेली सवलत तोकडी आहे. निर्यातबंदी पूर्णपणे उठविण्याची गरज आहे. वस्तुत: निर्यातबंदी करणेच चुकीचे आहे. त्यामुळे कांदा आयात करणाऱ्यांना आपल्या देशाबद्दल शंका येते. कालांतराने आपल्या निर्यातीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. केंद्राने निर्यातबंदी न करता देशात कांद्याचे दर चढे असल्यास किमान निर्यातमूल्य वाढविले तरी कांदा बाहेर जाणार नाही. मात्र त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत देशाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होणार नाही.- चांगदेवराव होळकर, माजी संचालक, नाफेड

टॅग्स :onionकांदा