शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

देशातील कांद्याची निर्यात मालदीवला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 05:15 IST

केंद्राचा निर्णय : मात्र २० हजार क्विंटलची मर्यादा

नाशिक : देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमी होत असतानाच केंद्र सरकारने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्याचे ठरविले आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी तसा आदेश काढला आहे.देशात वेगाने दर वाढत असल्याने सप्टेंबरच्या अखेरीस केंद्राने कांद्याची निर्यातबंदी केली आणि कांद्याची आयात करणे सुरू केले. दरम्यानच्या काळामध्ये कांद्याचे पीक आल्याने पुरवठा वाढून त्याचे दरही काहीसे कमी झाले. त्यामुळे सरकार व ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या बाजारपेठांत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे दर कमी होत असून केंद्राने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.त्यामुळे केंद्राने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्यास संमती दिली असून, तो तामिळनाडूच्या तुतीकोरीन बंदरामधून पाठवला जाणार आहे. सन २०१९-२०च्या कोट्यामधून मालदीवला ही निर्यात केली जाणार आहे. या निर्यातीसाठी घालून दिलेल्या कोट्यावर तुतीकोरीनचे कस्टम खाते लक्ष ठेवेल. मालदीवमध्ये कांदा काय दराने विकणार, त्याची खरेदी-विक्री कोण करणार, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्याचा दोन हजार रुपयांचा दर आणि तुतीकोरीनपर्यंत क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपये वाहतूक खर्च आणि निर्याती खर्च याचा विचार करता हा व्यवहार किती फायद्याचा राहील, याबाबत तज्ज्ञांना आहे.निर्यातीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अंशत: का होईना निर्यात होणार असल्यामुळे बाजारपेठांमध्ये विक्रीस येणाऱ्या कांद्याच्या दरात भविष्यात काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केंद्राने दिलेली सवलत तोकडी आहे. निर्यातबंदी पूर्णपणे उठविण्याची गरज आहे. वस्तुत: निर्यातबंदी करणेच चुकीचे आहे. त्यामुळे कांदा आयात करणाऱ्यांना आपल्या देशाबद्दल शंका येते. कालांतराने आपल्या निर्यातीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. केंद्राने निर्यातबंदी न करता देशात कांद्याचे दर चढे असल्यास किमान निर्यातमूल्य वाढविले तरी कांदा बाहेर जाणार नाही. मात्र त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत देशाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होणार नाही.- चांगदेवराव होळकर, माजी संचालक, नाफेड

टॅग्स :onionकांदा