शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Independence Day : स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?; तरुणाई म्हणते...

By सायली शिर्के | Published: August 15, 2019 3:15 PM

स्वातंत्र्य...  खरंतर 15 ऑगस्टची प्रकर्षाने आठवण करून देणारा एक शब्द.

स्वातंत्र्य...  खरंतर 15 ऑगस्टची प्रकर्षाने आठवण करून देणारा एक शब्द. स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? असं विचारल्यावर स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदी, मजा, मस्ती आणि फक्त धमाल, बायकोपासून सुटका, गर्लफ्रेंडचे नखरे नाही, बॉयफ्रेंडची कटकट नाही, मर्यादा नाहीत, बॉससोबत थेट भिडणं, घरबसल्या आरामात काम आणि सुट्टी अशी सोयीची उत्तरं हमखास मिळतात. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्' मधला फरक माहीत नसलेले राष्ट्रभक्तीचे गोडवे गातात तर कधी Independence Day आणि Republic Day म्हणजे नेमकं काय विचारल्यावर गोंधळणारे महाभागही इथेच भेटतात. स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळीच असते. 

केवळ एका दिवसासाठी राष्ट्रभक्ती उफाळून येते, स्वातंत्र्याचा उमाळा येतो, राष्ट्रप्रेमाचा तर अक्षरशः पूर. यत्र तत्र सर्वत्र 'तिरंगा'. पांढऱ्या रंगाचे कपडे तर त्या दिवसाचं खास आकर्षण. 15 ऑगस्टची सुट्टी वाया जाऊ नये यासाठी आदल्या दिवशी साजरा करणारेही इथलेच. सामाजिक भान, कर्तव्य विसरून प्रत्येक गोष्टीत फक्त प्रशासनाला धारेवर धरणारे तसेच स्वत: च्या चुकांवर पांघरून घालून स्वातंत्र्यावर गमजा मारणारेही बरेच भेटतात. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला नेमका फरक समजणं काळाजी गरज आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय वाटतं?,खरंच स्वातंत्र्य आहे का? यावर तरुणाईशी साधलेला संवाद...

 

स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. मात्र अजूनही अनेक लोक स्वातंत्र्यापासून दूर असल्याचं दिसून येतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच ज्यांची परिस्थिती बिकट असते किंवा जे लोक अशिक्षित असतात त्यांना तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर दूरची गोष्ट, स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? याची देखील पूर्णपणे कल्पना नसते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा अशा व्यक्तींना कशा पद्धतीने होईल याचा विचार केला तर देश खरंच प्रगतीपथावर वाटचाल करेल आणि स्वातंत्र्य हा शब्द खऱ्या अर्थाने समजण्यास मदत होईल. 

- मुकेश चव्हाण

स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताने प्रत्येक क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे. पण मिळालेल्या स्वातंत्र्याचा नेमका अर्थ देखील कळणं गरजेचं आहे. फक्त एका दिवसासाठी मीडियावर पोस्ट करण्यापुरतं देश प्रेम न राहता देशाबद्दल आदर आणि प्रेम हे निरंतर राहणं गरजेचं आहे. एका पोस्टच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला जर कोणत्याही पद्धतीने देशासाठी काहीही करण्याची संधी मिळाली तर जरूर त्याचा योग्य वापर करावा आणि स्वातंत्र्य दिन साजरा करताना त्या मागचा भारत समजून घ्यावा. 

- निधी पेडणेकर

 

स्वातंत्र्य हा शब्द ऐकल्यावर आपल्याला 15 ऑगस्टची आठवण येते कारण या दिवशी भारत देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. भारतीयांना हक्क मिळाले. पण तसं म्हणायला गेलं तर आज अनेक स्त्रियांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. आजही अनेक भागांमध्ये स्त्रियांवरती अत्याचार होतात. लहान मुलींपासून ते वयोवृद्ध स्त्रियांवर देखील बलात्कार होताना दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशभरात स्त्रियांवरती अत्याचार होतात. त्या स्त्रिया आहेत का स्वातंत्र्यात हा प्रश्नच आहे. 

- श्रुती जाधव

 

आज आपण 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.  2019 मध्ये सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जम्मू काश्मीरमधील 'कलम 370' रद्द केल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला असं म्हणता येईल. पण दुसरीकडे सांगली-कोल्हापुरात महापुराने जनजीवन, संसार उद्ध्वस्त झाले असल्याने त्यांना मदतीचा हात देऊन आपल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून घेण्याची आता वेळ आली आहे. 

- नितीन कुऱ्हे

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण नेहमी भारत माझा देश आहे असं म्हणतो पण इतर दिवशी नियम तोडून ही गोष्ट सर्रास विसरतो. फक्त एका दिवसासाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, फेसबुक किंवा सोशल मीडियावर देशप्रेम दाखवण्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे देखील भान ठेवणं गरजेचं आहे.   

- आरती उतेकर

 

देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे पण देशातील महिलांना नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री उभी आहे. परंतु तिला अनेक ठिकाणी तू एक महिला आहेस म्हणून अशी राहा, तू हे करू नकोस असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मग महिलांना स्वातंत्र्य कसं काय? त्यामुळे मला असं वाटतं की देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण महिलांना अद्याप नाही.

- समिक्षा राऊत

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत