शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:03 IST

भारत पाकिस्तान सामन्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Aditya Thackeray on IND VS PAK Match: भारताने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. भारत स्पर्धेत अपराजित राहिला आणि पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. तिलक वर्माने भारतासाठी एक अपवादात्मक खेळी खेळली आणि नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतर राजकारण तापलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा धूळ चारली. यावेळी भारतीय संघाने  आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरुनच आदित्य ठाकरे यांनी टीका केली. ट्रॉफी न स्विकारणं आणि हस्तांदोलन न करणं ही सगळी नाटकं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ९ व्यांदा विजेतेपद पटकावले. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. त्यामुळे सामन्यांमध्ये खेळाडूंमध्ये तणाव पाहायला मिळाला. सुरुवातीपासून भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला महत्त्व दिलं नाही. त्यानंतर ट्ऱॉफी स्विकारण्यासही नकार दिला. या कृतीमुळे भारतीय संघाचे कौतुक करण्यात येत आहे. दुसरीकडे यावरुन आदित्य ठाकरे यावरुन भाजपवर निशाणा साधला. आपण हा सामना  खेळायला नको होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर  भाजप आपल्याला अशी देशभक्ती शिकवणार का? असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

"हात मिळवणे किंवा न मिळवणे, ट्रॉफी घेणे किंवा न घेणे, ही सगळी नाटकं आहेत. सगळ्यात आधी आपण खेळायला नको होते. पाकिस्तानने बिहारमधील हॉकी आशिया कपवर बहिष्कार टाकला. आपण यावर बहिष्कार टाकू शकलो नसतो का? हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये आपल्या भारतीय नागरिकांना मारल्यामुळे घडले. भाजप असेही म्हणते की त्यांना मारण्यात आले कारण ते हिंदू होते. गेल्या वर्षी आपल्याला सांगण्यात आले की बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने त्यांना येथे बोलावले आणि बांगलादेशसोबत द्विपक्षीय मालिका खेळली. त्याच भारत सरकारने बांगलादेशला तांदूळ आणि धान्य पाठवले. या वर्षी पहलगाममध्ये हल्ला झाला. हिंदू मारले गेले. याचा सूड म्हणून भारत पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. हे काय आहे? आणि हीच भाजप आपल्याला देशभक्ती शिकवणार का? तुम्ही फक्त एका सामन्यापासून मागे हटू शकत नाही का? आपल्या सैनिकांचे शहीदत्व क्रिकेटपेक्षा कमी महत्त्वाचे आहे का? तुम्हाला याचा विचार करण्याची गरज आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या एक्स पोस्टवरूनही निशाणा साधला. खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर झालं असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "मला वाटते की हे दुर्दैवी आहे की ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये आपल्या सैनिकांनी शौर्य दाखवले, शहीद झाले याची तुलना खेळाशी केली जात आहे. काही लोक म्हणतात की राजकारण आणि खेळाला एकत्र आणू नका. पण जेव्हा दहशतवादी येतात तेव्हा ते विचारतात का? भारतीयांवर ते हल्ले करतात मग आपण त्या देशासोबत का खेळायचं?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aditya Thackeray criticizes India-Pakistan match after Asia Cup victory.

Web Summary : Aditya Thackeray questioned the need for India to play Pakistan after the Asia Cup win, calling it a 'drama'. He criticized comparing the victory to Operation Sindoor and questioned BJP's patriotism, asking why a match is prioritized over soldiers' sacrifices.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAaditya Thackerayआदित्य ठाकरेOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपा