शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 21:12 IST

IND vs PAK Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरुन राजकारण तापले आहे.

IND vs PAK Asia Cup 2025:भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरुन राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे गटाने हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर, रविवारी (14 सप्टेंबर) पक्षाने निषेध आंदोलनही केले होते. या सामन्याला घेऊन पक्षाचे नेते केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिवसेना (उबाठा) प्रवक्ते आनंद दुबे यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'काल झालेला सामना हा भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला नाही, तर BCCI आणि पाकिस्तानमध्ये झाला. कालचा सामना BCCI ने जिंकला, भारताने नाही.'

सामना न व्हावा हीच भारताची इच्छा 

आनंद दुबे म्हणाले की, 'हा सामना होऊ नये, हीच भारतीयांची इच्छा होती. ज्या प्रकारे पाकिस्तानने आपल्या देशात घुसखोरी करुन हल्ला केला, आपल्या माता-बहिणींचे सिंदूर उजाडले, त्यामुळे संपूर्ण देश संतापलेला आहे. पाकिस्तानला कोणत्याही किंमतीवर माफ करण्यास देश तयार नाही. पण दुर्दैवाने देशात असे केंद्र सरकार आहे, ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम उतू जातंय. या विरोधात आम्ही आंदोलन केले. पण भाजपने थोड्याशा पैशासाठी देशभक्तीला बगल दिली. आपल्या देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्या आहेत,' अशी टीका दुबेंनी केली.

“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेटच्या पैशातून दहशतवाद पोसतो 

ते पुढे म्हणाले, 'आपल्याला माहिती आहे का, काल जो सामना झाला त्यातून भारत आणि पाकिस्तान दोघांनाही पैसे मिळाले. त्यातील काही रक्कम पीसीबीलाही (पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड) जाते. पीसीबीकडे पैसे गेल्यावर त्याच पैशातून पाकिस्तान दहशतवादाला पोसतो. तेच दहशतवादी आपल्या देशात पाठवले जातात. आयएसआय त्यांना ट्रेनिंग देते आणि त्याच पैशातून पाक आर्मीला निधी मिळतो. या सगळ्याचा फटका आज नाही तर उद्या आपल्यालाच बसणार आहे. म्हणूनच आम्ही सामना रद्द करण्याची मागणी करत होतो.' 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेIndiaभारतPakistanपाकिस्तानAsia Cup 2025आशिया कप २०२५