शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 21:12 IST

IND vs PAK Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरुन राजकारण तापले आहे.

IND vs PAK Asia Cup 2025:भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरुन राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे गटाने हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर, रविवारी (14 सप्टेंबर) पक्षाने निषेध आंदोलनही केले होते. या सामन्याला घेऊन पक्षाचे नेते केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिवसेना (उबाठा) प्रवक्ते आनंद दुबे यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'काल झालेला सामना हा भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला नाही, तर BCCI आणि पाकिस्तानमध्ये झाला. कालचा सामना BCCI ने जिंकला, भारताने नाही.'

सामना न व्हावा हीच भारताची इच्छा 

आनंद दुबे म्हणाले की, 'हा सामना होऊ नये, हीच भारतीयांची इच्छा होती. ज्या प्रकारे पाकिस्तानने आपल्या देशात घुसखोरी करुन हल्ला केला, आपल्या माता-बहिणींचे सिंदूर उजाडले, त्यामुळे संपूर्ण देश संतापलेला आहे. पाकिस्तानला कोणत्याही किंमतीवर माफ करण्यास देश तयार नाही. पण दुर्दैवाने देशात असे केंद्र सरकार आहे, ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम उतू जातंय. या विरोधात आम्ही आंदोलन केले. पण भाजपने थोड्याशा पैशासाठी देशभक्तीला बगल दिली. आपल्या देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्या आहेत,' अशी टीका दुबेंनी केली.

“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेटच्या पैशातून दहशतवाद पोसतो 

ते पुढे म्हणाले, 'आपल्याला माहिती आहे का, काल जो सामना झाला त्यातून भारत आणि पाकिस्तान दोघांनाही पैसे मिळाले. त्यातील काही रक्कम पीसीबीलाही (पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड) जाते. पीसीबीकडे पैसे गेल्यावर त्याच पैशातून पाकिस्तान दहशतवादाला पोसतो. तेच दहशतवादी आपल्या देशात पाठवले जातात. आयएसआय त्यांना ट्रेनिंग देते आणि त्याच पैशातून पाक आर्मीला निधी मिळतो. या सगळ्याचा फटका आज नाही तर उद्या आपल्यालाच बसणार आहे. म्हणूनच आम्ही सामना रद्द करण्याची मागणी करत होतो.' 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेIndiaभारतPakistanपाकिस्तानAsia Cup 2025आशिया कप २०२५