शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:21 IST

मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठविणार प्रस्ताव, आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे, त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्याचा विचार सुरू झाला आहे. या बाबतचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व रायगड या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सरकारची नोकरभरती थांबलेली आहे. कारण, तेथील बिंदुनामावली प्रमाणित करण्यात आलेली नाही. 

आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे, त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे, अशी आदिवासी समाजाची मागणी आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ही बैठक झाली. 

बैठकीला मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अशोक उईके, अतुल सावे आदी उपस्थित होते. भुसे आणि भुजबळ यांनी आदिवासी समाजास अतिरिक्त आरक्षण देताना एसईबीसी, ईडब्लूएस, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, अशा सूचना केल्या. 

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आदिवासीबहुल जिल्ह्यांत लोकसंख्येच्या अनुपातात आदिवासींना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच होईल, असा विश्वास आहे. तशी संवैधानिक तरतूद देखील आहे, ती अंमलात आणावी, अशी मागणी आहे. 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले की, या आठ जिल्ह्यांमध्ये बहुजन समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. अशावेळी आदिवासींना वाढीव आरक्षण द्यायचे, म्हणून आदिवासींना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षण दिले आहे.

टॅग्स :reservationआरक्षणjobनोकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार