शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:21 IST

मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठविणार प्रस्ताव, आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे, त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्याचा विचार सुरू झाला आहे. या बाबतचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व रायगड या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सरकारची नोकरभरती थांबलेली आहे. कारण, तेथील बिंदुनामावली प्रमाणित करण्यात आलेली नाही. 

आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे, त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे, अशी आदिवासी समाजाची मागणी आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ही बैठक झाली. 

बैठकीला मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अशोक उईके, अतुल सावे आदी उपस्थित होते. भुसे आणि भुजबळ यांनी आदिवासी समाजास अतिरिक्त आरक्षण देताना एसईबीसी, ईडब्लूएस, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, अशा सूचना केल्या. 

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आदिवासीबहुल जिल्ह्यांत लोकसंख्येच्या अनुपातात आदिवासींना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच होईल, असा विश्वास आहे. तशी संवैधानिक तरतूद देखील आहे, ती अंमलात आणावी, अशी मागणी आहे. 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले की, या आठ जिल्ह्यांमध्ये बहुजन समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. अशावेळी आदिवासींना वाढीव आरक्षण द्यायचे, म्हणून आदिवासींना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षण दिले आहे.

टॅग्स :reservationआरक्षणjobनोकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार