भातसा, बारवी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ
By Admin | Updated: July 9, 2016 17:59 IST2016-07-09T17:59:49+5:302016-07-09T17:59:49+5:30
भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे

भातसा, बारवी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ
>ऑनलाइन लोकमत -
ठाणे, दि. 09 - भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे असे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून समजते. भातसामध्ये सध्या ४१.०१ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी याच सुमारास ते ३६.३५ टक्के होते. बारवी मध्ये सध्या ३३.५३ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी ते याच सुमारास २३.८० टक्के इतके होते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत बऱ्याच प्रकल्पांत यंदा चांगला पाणीसाठा हे असे दिसते.
टाटा कंपनीकडील पुणे जिल्ह्यातल्या आंध्र प्रकल्पात मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणजे १३.३२ टक्के पाणीसाठा आहे. याठिकाणी गेल्या वर्षी २०.६३ टक्के पाणी होते. लघू प्रकल्पापैकी जांभे, डोळखांब, आदिवली या शहापूर तालुक्यातील तर अंबरनाथ मधील भोज आणि मुरबाड तालुक्यातील घसाई आणि पाडाळे या प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसई, जान्भूर्डे, उसगाव, जांभिवली या प्रकल्पांतही पावसामुळे चांगला पाणीसाठा झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील धामणी या मोठ्या प्रकल्पात ३९.७७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ३६.४४ टक्के होता. तर कवडास मध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. बृहन्मुंबई मनपाकडे असलेल्या २२.३० इतका तर तानसा मध्ये ३२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दोन्ही तलावांमध्ये अनुक्रमे ४२.६३ आणि १८ टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीपेक्षा या वेळेस धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचे दिसते.
(गेल्या वर्षीची आकडेवारी कंसात मिमी मध्ये १ जूनपासून )
धामणी ८३१ मिमी( ६३१ मिमी), कवडास ८३१ मिमी( ६५१ मिमी), भातसा ६८१मिमी( ६२४ मिमी), वांद्री ८३९ मिमी( ६८७ मिमी), मोडकसागर ५९६ मिमी( ५११ मिमी), तानसा ६०८.६० मिमी ( ४३० मिमी), बारवी ६६८ मिमी( ३९४ मिमी).