शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

उसाच्या ‘एफआरपी’मध्ये वाढ

By admin | Updated: May 25, 2017 02:01 IST

केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने आगामी (सन २०१७-१८) हंगामासाठी उसाला टनास २५० रुपये गतवर्षीपेक्षा जादा वाजवी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने आगामी (सन २०१७-१८) हंगामासाठी उसाला टनास २५० रुपये गतवर्षीपेक्षा जादा वाजवी आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्याची केलेली शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केली. त्यामुळे आगामी हंगामात पहिली उचल टनास २५0 रुपयांनी वाढून मिळणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ सरासरी १२ टक्के होते. कृषिमूल्य आयोग कृषी उत्पादनांच्या आधारभूत किमती निश्चित करतो व त्याची शिफारस ‘कॅबिनेट कमिटी आॅफ इकॉनॉमी अफेअर्स’ या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्वोच्च समितीला केली जाते. आयोगाने केलेली शिफारस या समितीने मान्य केल्यास ती ‘अधिकृत’ म्हटले जाते. गतवर्षी (म्हणजे सध्याचा हंगाम) टनास २३०० रुपये एफआरपी होती. ती आता २५५० रुपये करण्याची शिफारस आहे म्हणजे टनास २५० रुपये वाढले आहेत. हा दर ९.५० उताऱ्याचा असतो. याचा अर्थ साडेनऊ उताऱ्यास २५५० रुपये मिळतील. उताऱ्याच्या वाढीव एका पाँईटला गतवर्षी २४३ रुपये मिळत होते. यंदा ते २६८ रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ११.५० असतो. त्यानुसार हिशेब केल्यास वाढीव दोन पाँईटचे सुमारे ५३६ रुपये जास्त मिळतील. त्यामुळे ‘एफआरपी’ची रक्कम टनास ३०८६ रुपये येते. पश्चिम महाराष्ट्रातील उतारा सरासरी १२.५० असतो. एका पाँईटचे त्यात आणखी २६८ रुपये वाढू शकतात. त्यामुळे ही रक्कम ३३५४ पर्यंत जाते. त्यातून तोडणी-ओढणी वाहतुकीचे प्रतिटन ६०० रुपये वजा जाता टनास किमान २७५४ रुपयास मरण नाही, हे निश्चित आहे.मागच्या हंगामातील ५०० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळवून द्यायचा, हा आमचा सध्याचा प्राधान्यक्रम आहे. भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर दोन वर्षे एफआरपीमध्ये वाढच केली नव्हती. किमान आता तरी त्यांना ती सुबुद्धी सुचली याबद्दल त्यांचे अभिनंदन. गतवर्षी आम्ही एफआरपीपेक्षा पहिला हप्ता १७५ रुपये जास्त घेतला. त्यामुळे पुढील वर्षी बाजारात साखरेचे दर कसे राहतात त्याचा हिशेब करून पहिल्या उचलीची मागणी करू. केंद्र सरकारने साखरेला चांगला दर मिळेल अशी धोरणे राबवावीत एवढीच अपेक्षा आहे.- खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनागतवर्षीच्या हंगामात उसाची टंचाई असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा टनास १७५ रुपये जास्त मिळाले आहेत; परंतु गुजरातमधील गणदेवी सहकारी साखर कारखान्याने टनास ४४०० रुपये अंतिम दर जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीतही खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही अजून ५०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यातील साखर सोडणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी त्या मागणीसाठी ‘आत्मक्लेश पदयात्रा’ही सुरू केली आहे. एका बाजूला एफआरपीत वाढ करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते परंतु त्याचवेळेला साखरेच्या दराबाबत मात्र फारसे दीर्घपल्ल्याचे धोरण अंमलात आणले जात नाही. परिणामी बाजारात दरच नसेल तर पैसा आणायचा कुठून आणि एफआरपी द्यायची कशातून, असा प्रश्न कारखानदारीसमोर उभा राहतो. आगामी हंगामातही ते आव्हान नक्कीच असेल.