शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वाढवा, वीज वाचवा!

By admin | Updated: August 22, 2014 01:37 IST

देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ऊर्जाक्षेत्राची भूमिका मोलाची ठरणार आहे. केंद्र सरकार वीज उत्पादन वाढविण्यास कटिबद्ध आहे. जनतेनेही वीज बचतीसाठी पुढाकार घ्यावा,

नरेंद्र मोदी यांचा मंत्र : ‘एनटीपीसी’च्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पणनागपूर : देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ऊर्जाक्षेत्राची भूमिका मोलाची ठरणार आहे. केंद्र सरकार वीज उत्पादन वाढविण्यास कटिबद्ध आहे. जनतेनेही वीज बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज वाढवा, वीज वाचवा, असा मंत्र दिला. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) १००० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचे राष्ट्रार्पण गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल के.शंकरनारायणन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार कृपाल तुमाने, एनटीपीसीचे मुख्य प्रबंध संचालक डॉ. अरुण रॉय चौधरी, ऊर्जा मंत्रालयाचे अप्पर सचिव देवेंद्र चौधरी यावेळी उपस्थित होते.‘देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास विजेच्या माध्यमातून होऊ शकतो. ग्रामीण भागात विजेच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वीज पोहोचावी, ही केंद्राची प्राथमिकता आहे. विजेचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वीज आली की उद्योग येतात आणि पर्यायाने रोजगार निर्माण होतात.जिथे-जिथे आणि ज्या ऊर्जा स्रोतातून शक्य होईल तेथून वीजनिर्मिती करण्यात येईल, असे मोदी म्हणाले. एनटीपीसीच्या या प्रकल्पामुळे विदर्भातील जनतेचा व शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे ते म्हणाले. केंद्र शासनाने देशात वीजनिर्मितीच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या आहेत. भूतान, नेपाळ या शेजारच्या देशांमध्येही वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती करणारे संयंत्र देशभरात सौरशक्तीच्या उपलब्धतेनुसार लावण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विजेचा उपयोग करून आज देशातील शेतकरी उत्पादनक्षम शेती करीत असल्याचे गौरवोद्गार काढत पंतप्रधान म्हणाले, सावकारी कर्जाच्या पाशामुळे देशाच्या काही भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना फायद्याची ठरणारी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी प्रधानमंत्री जन-धन योजना सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते उघडण्यात येणार आहे. खातेदाराने कुटुंबाचे खाते उघडताच केंद्र सरकार खातेदाराच्या कुटुंबाचा एक लाख रुपयाचा विमा काढणार आहे.नागपूर देशात ऊर्जाकेंद्र बनणारनितीन गडकरी यांनी एनटीपीसीच्या या प्रकल्पामुळे नागपूर देशात ऊर्जाकेंद्र बनणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच वीजनिर्मितीमुळे या परिसराचा विकास होऊन उद्योग येतील. परिणामी रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच नागपूर विभागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी १००० शौचालय बांधण्यासाठी एनटीपीसी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.