शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

'इनकमिंग'ने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गाजणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:41 IST

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेला मोठा विजय, मराठा आरक्षण मुद्दा आणि विरोधी पक्षातून सुरू असलेले पक्षांतर यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात पावरफुल झाला आहे. शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. आधीच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांनी इनकमिंग सुरू आहे. त्यात आता मुख्यमंत्री महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष पूर्ण तर रिकामा होणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपाची महाजनादेश यात्रा १ ते ३१ ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे सहाजिकच भाजपची ताकत वाढणार आहे. किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा हा पण हेतू तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे विरोधीपक्ष पूर्णच रिकामा होतो की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विजयाची खात्री नसल्याने नेत्यांचे पलायन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यास इच्छूक आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर करून आपापले नियोजन लावले आहे. राज्यातील भाजपची वाढलेली ताकत आणि शिवसेनेसोबत असलेली युती यामुळे अनेक नेत्यांना विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नाही. तर काहींना मंत्रीपदाची आस लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते पलायन करण्याच्या तयारीत आहेत.