शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'इनकमिंग'ने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गाजणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:41 IST

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेला मोठा विजय, मराठा आरक्षण मुद्दा आणि विरोधी पक्षातून सुरू असलेले पक्षांतर यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात पावरफुल झाला आहे. शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. आधीच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांनी इनकमिंग सुरू आहे. त्यात आता मुख्यमंत्री महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष पूर्ण तर रिकामा होणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपाची महाजनादेश यात्रा १ ते ३१ ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे सहाजिकच भाजपची ताकत वाढणार आहे. किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा हा पण हेतू तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे विरोधीपक्ष पूर्णच रिकामा होतो की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विजयाची खात्री नसल्याने नेत्यांचे पलायन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यास इच्छूक आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर करून आपापले नियोजन लावले आहे. राज्यातील भाजपची वाढलेली ताकत आणि शिवसेनेसोबत असलेली युती यामुळे अनेक नेत्यांना विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नाही. तर काहींना मंत्रीपदाची आस लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते पलायन करण्याच्या तयारीत आहेत.