शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'इनकमिंग'ने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गाजणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:41 IST

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेला मोठा विजय, मराठा आरक्षण मुद्दा आणि विरोधी पक्षातून सुरू असलेले पक्षांतर यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात पावरफुल झाला आहे. शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. आधीच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांनी इनकमिंग सुरू आहे. त्यात आता मुख्यमंत्री महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष पूर्ण तर रिकामा होणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपाची महाजनादेश यात्रा १ ते ३१ ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे सहाजिकच भाजपची ताकत वाढणार आहे. किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा हा पण हेतू तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे विरोधीपक्ष पूर्णच रिकामा होतो की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विजयाची खात्री नसल्याने नेत्यांचे पलायन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यास इच्छूक आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर करून आपापले नियोजन लावले आहे. राज्यातील भाजपची वाढलेली ताकत आणि शिवसेनेसोबत असलेली युती यामुळे अनेक नेत्यांना विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नाही. तर काहींना मंत्रीपदाची आस लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते पलायन करण्याच्या तयारीत आहेत.