शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यात दररोज तीन ठिकाणी पोलिसांना मारहाणीच्या घटना; आतापर्यंत ८१२ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 04:32 IST

कोविडच्या प्रतिबंधासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही अहोरात्र झटत आहेत. विनाकारण भटकणाºया नागरिकांना रोखणे आणि गरजूना मदत करण्याची भूमिका बजावित आहेत.

मुंबई : राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांशी मारहाण करणे, त्यांना हुज्जत घालण्याच्या घटना वाढत राहिल्या आहेत. रोज सरासरी दोन ते तीन गुन्हे दाखल होत असून या हल्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ८१२ जणांना अटक करण्यात आली आहे. तर काहीजण फरारी आहेत.कोविडच्या प्रतिबंधासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही अहोरात्र झटत आहेत. विनाकारण भटकणाºया नागरिकांना रोखणे आणि गरजूना मदत करण्याची भूमिका बजावित आहेत. मात्र काही समाजकटंक व माथेफिरू नागरिक जमावबंदीचा आदेश डावलून नियमांचे राजरोसपणे उल्लंघन करीत आहेत. पोलीस त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याशी हुज्जत घालणे, नाकाबंदीत अंगावर गाडी घालणे, मारहाण करण्याचे प्रकार करीत आहेत. २२ मार्चपासून १६ मे पर्यत राज्यात अशा तब्बल २३६ घटना घडल्या आहेत, म्हणजेच रोज सरासरी दोन ते तीन प्रकार घडत आहेत. त्यांच्यावर शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाºयाला मारहाण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ८१२ जणांना अटक केली आहे. तर काही हल्लेखोर फरारी आहेत. त्याचा शोध सुरु आहे. तर लॉकडाउनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे .या काळात अवैध वाहतूक करणाºया १३०५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८,५६८ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. राज्यात एकूण ३८८४ रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३,७१,३१० लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.कोविड संदर्भात एक लाख ९ हजार गुन्हेलॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यभरात आतापर्यंत कोविड संदर्भातील एक लाख ९ हजार ३९४ गुन्हे दाखल झाले आहेत. जमावबंदी आदेश मोडणे, अवैध वाहतूक आणि पोलिसांना मारहाणप्रकरणी हे गुन्हे असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी २०,६२६ व्यक्तींना अटक केली आहे. तर चार कोटी ३६ लाख ७४ हजार ८९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या काळात पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ९३ हजार फोन आले. तर अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,६८,९७१ पास देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस