शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

केंद्र सरकार देणार तृणधान्याला प्रोत्साहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 20:36 IST

अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित

पुणे : केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. या अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात होत आहे. गणेश खिंड रस्त्यावरील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को आॅपरेटीव्ह मॅनेजमेंट (वॅमनिकॉम) या संस्थेत हा कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि महाराष्ट्राच्या कृषि विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने १३ एप्रिल २०१८ला ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांचे उत्पादन, वापर आणि व्यापार वाढावा यासाठी त्यांना पौष्टिक अन्नधान्य (न्यूट्री-सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य पिके घेणारी आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडु, तेलंगना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये देखील यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात न्यूट्री-सिरीअल पिकांची विविधता, लागवड, उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावरील संकल्पना मांडण्यात येतील. तसेच त्यावरील प्रदर्शनही आयोजित केले जात आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कृषी उत्पादक कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन व विकास संस्था यासारखे विविध भागधारकही यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारीस प्रोत्साहन दिले जाईल. ............

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती