शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

केंद्र सरकार देणार तृणधान्याला प्रोत्साहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 20:36 IST

अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित

पुणे : केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. या अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात होत आहे. गणेश खिंड रस्त्यावरील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को आॅपरेटीव्ह मॅनेजमेंट (वॅमनिकॉम) या संस्थेत हा कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि महाराष्ट्राच्या कृषि विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने १३ एप्रिल २०१८ला ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांचे उत्पादन, वापर आणि व्यापार वाढावा यासाठी त्यांना पौष्टिक अन्नधान्य (न्यूट्री-सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य पिके घेणारी आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडु, तेलंगना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये देखील यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात न्यूट्री-सिरीअल पिकांची विविधता, लागवड, उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावरील संकल्पना मांडण्यात येतील. तसेच त्यावरील प्रदर्शनही आयोजित केले जात आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कृषी उत्पादक कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन व विकास संस्था यासारखे विविध भागधारकही यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारीस प्रोत्साहन दिले जाईल. ............

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती