शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

" मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत अपुरी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 21:00 IST

राज्य सरकारच्या नुकसान भरपाईच्या घोषणेवर शेतकरी, शेतकरी संंघटना नाराज..

ठळक मुद्दे शेती व्यवसाय रूग्णशय्येवर, बुस्टर डोसची गरज

रविकिरण सासवडे - 

बारामती : अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ती अपुरी आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या मदतीमध्ये हे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने बळीराजाला मदत करावी, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

शेट्टी म्हणाले; अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, विहिरी वाहून गेल्या आहेत. हे सर्व पुन्हा उभे करण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारची ही मदत पुरेशी पडणार नाही. त्यांना वाढून मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे अजून पाठपुरावा करावा. केंद्र आणि राज्य यांनी मिळून या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. त्याशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही. 

शेती व्यवसायावर आलेल्या एकामागोमाग संकटामुळे रूग्णशय्येवर असताना या व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी 'बुस्टर' डोसची गरज आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तत्कालीन राज्य शासनाला ओला दुष्काळ जाहिर करावा लागला होता. त्यातून सावरत शेती व्यवसाय पूर्वपदावर येणार इतक्यात कोरोना संकटामुळे शेतमाल विक्रीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. परिणामी पिके चांगली येऊन सुद्धा ती विकता न आल्याने अनेक शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फटका बसला. कोरोना संकटानंतर अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे शेती व्यवसायावर मोठा आघात झाला. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने २ हेक्टरच्या मर्यादेत केलेली हेक्टरी १० हजाराची आणि फळबागांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत अपुरी आहे.

 ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून जाण्याचे प्रकार घडले. तसेच काही ठिकाणी विहीरी देखील बुजल्या गेल्या, काही ठिकाणी जनावरे वाहून गेली, याबाबत मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत स्पष्टता या घोषणेमध्ये सध्या तरी दिसत नाही. खरीप पिकांच्या नुकसानीसोबतच आगामी रब्बी हंगाम देखील अतिवृष्टीमुळे लांबला आहे. शेतामध्ये अद्यापही पाणी असल्याने रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. परिणामी सध्या राज्य शासनाने केलेली मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. 

आर्थिक अडचणी सांगू नका, पुरेशी मदत करा...राज्य शासनाने आर्थिक अडचणी सांगू नयेत. शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची मदत मिळायला हवी होती. मात्र केंद्र आणि राज्य शासन याबाबत गंभीर नाही. मुळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळाली तर त्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याची ताकद देखील मिळते. त्यासाठी कोणावर अवलंबून रहावे लागत नाही. यापूर्वी देखीलकेंद्रातील काँग्रेस व नंतरच्या भाजप सरकारने स्वामीनाथन आयोगाच्याशिफारशींचं पोतेरं करून टाकले. शेतकऱ्यांना मदत करायची वेळ आली की मुख्यमंत्री अर्थिक अडचणींचा पाढा वाचतात. मात्र इतर ठिकाणी दिवाळी सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे.

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.

.......कोरडा दुष्काळ परवडला परंतू ओला दुष्काळ नको...एक वेळ कोरडा दुष्काळ परवडला परंतू ओला दुष्काळ नको अशी परिस्थिती आहे. कोरड्या दुष्काळात शेतकरी मशागत आणि पिक पेरणीचा खर्च करत नाही. मात्र ओल्या दुष्काळामुळे कर्ज काढून हात उसने पैसे घेऊन केलेली मशागत आणि पेरणी अक्षरश: वाया गेली. एका हेक्टर कांद्यासाठी शेतकºयाचा ७० हजार रूपये खर्च होतो. कांद्याचे बियाणेच ४ हजार रूपये किलो आहे. त्यामुळे ही मदत अपुरी आहे.

- दिनेश काळे, कांदा उत्पादक शेतकरी, जैनकवाडी 

———————————

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Shettyराजू शेट्टीRainपाऊस