शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

तिसऱ्या टप्प्यात काही नाव न सांगता प्रवेश होतील; उदय सामंतांचा इशारा, सकाळचा नाश्ता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:50 IST

मातोश्रीवर ठाकरेंनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

एकनाथ शिंदे गडाच्या ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. राजापूरचे माजी आमदार साळवींच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता कोणाचा नंबर असा सवाल उपस्थित केला जात आहे. मातोश्रीवर ठाकरेंनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. त्या पक्षात नवीन पदाधिकारी नेमणूक काही गैर नाही. नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता मात्र घ्या , असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला. संजय राऊत यांचा राजापूर दौरा होणार असेल तर ती पक्षाची रणनीती आहे. असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. निवडणुका झाल्या झाल्या आत्म चिंतनाला सुरुवात झाली असती तर बरे झाले असते. कालच्यासारखे प्रसंग उभे राहिले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पंधरा दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्या बाबतीत सुद्धा संजय राऊत हेच बोलले होते. साळवी कडवट शिवसैनिक आहेत असे ते म्हणाले होते. आताही भास्कर जाधवांबाबत असेल बोलत आहेत. कदाचित त्यांनी भास्कर जाधवांवरचा विश्वास म्हणून ते बोलले असतील. शिंदेंकडे कुणी जेवायलाच जायचे नाही आता असा आदेश आला आहे. कदाचित सकाळचा नाश्ता काय करायचा याबाबत सुद्धा आदेश निघेल, असेही सामंत म्हणाले. 

शिंदे गटात तिसऱ्या टप्प्यात काही पक्षप्रवेश होणार आहेत. ते नाव न सांगता होणार आहेत. आदल्या दिवशी तुम्हाला नाव सांगितले जाईल असे सामंत म्हणाले. अनेक लोकांना शिंदेंचे नेतृत्व मान्य झालेले आहे. काल स्वतःहून काही लोक सांगत होते की, आमचा प्रवेश करून घ्या, त्यांचा तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करून घेण्यात येणार आहे. राजा का बेटा राजा नही बनेगा याचा अर्थ कार्यकर्त्यांना मोठे करायचे आहे, एखादा नेता मोठा होत असेल तर त्याचे पाय छाटायचे नसतात, यावरून शिंदेंनी रामदास कदमांचे उदाहरण दिले आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत