शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नाव न घेता अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात; "सर्कशीतील रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 10:11 IST

महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.

बारामती - Amol Kolhe on Ajit Pawar ( Marathi News ) शेतकरी आक्रोश मोर्चा निघाल्यापासून महाराष्ट्र सरकारमधले अनेक मंत्री घाईघाईनं टीका का करायला लागले? इतिहासात झोकावून पाहिले तर स्वराज्य काळात वतनदार आपली वतनं वाचवण्यासाठी कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी मुघलशाहीकडे जात होती. रयतेच्या कल्याणाचे देणंघेणं कुणालाही नव्हतं. आज शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येतायेत. महाराष्ट्राचे प्रश्न समोर येतायेत. राज्याचा स्वाभिमान डिवचला जातोय पण काही मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय हे विचारण्याचे धाडस नाही कारण वतन वाचवायचे आहे अशी परिस्थिती नाही ना...अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. 

बारामती इथं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सभेला कोल्हे संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, वाघ आपल्याला लय आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होतात. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभं राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात. कारण या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला. 

तसेच मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही. कारण पुन्हा येईन म्हटलं की अडीच वर्षांनी येता येतंय. अडीच वर्षाने आल्यानंतर तेदेखील अर्धच येता येते. आणि काही दिवसांनी अर्ध्याच्याही अर्ध होतंय. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणार नाही. बारामतीत आज माझे स्वागत केले त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे. सुप्रिया सुळेंना संसदेत वावरताना बघतो तेव्हा मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा महाराष्ट्राचा वारसा आणि वसा समर्थ हातात आहे याची खात्री पटते. मधल्या काळात ज्या घडामोडी झाल्या त्यात २ पर्याय होते. एक दडपशाहीसमोर गुडघे टेकण्याचा होता, गुडघे टेकले असते तर नक्कीच फायदा झाला असतो. स्वार्थ साधला गेला असता. पण दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाहीत तर ताठ मानेने संघर्ष करायचा. संघर्षाची वाट असते तेव्हा नजरेला नजर भिडवून स्वाभिमानाने त्याला सवाल विचारता येतो. हा सवाल विचारण्याचा मार्ग सुप्रिया सुळे आणि मी निवडला आहे असं अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवारांची एक ताकद शक्ती पाठीमागे उभी आहे. ज्या मातीने संपूर्ण देशाला भूषण वाटावा असं रत्न दिला. त्या बारामतीच्या मातीसमोर मी नतमस्तक होतो आणि उरलेले पुण्याच्या सभेत दिलखुलास बोलेन. शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकण्यासाठी पुण्यातील सभेला तुम्ही उपस्थित राहावे असं आवाहन कोल्हे यांनी उपस्थितांना केले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस