शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नाव न घेता अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात; "सर्कशीतील रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 10:11 IST

महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.

बारामती - Amol Kolhe on Ajit Pawar ( Marathi News ) शेतकरी आक्रोश मोर्चा निघाल्यापासून महाराष्ट्र सरकारमधले अनेक मंत्री घाईघाईनं टीका का करायला लागले? इतिहासात झोकावून पाहिले तर स्वराज्य काळात वतनदार आपली वतनं वाचवण्यासाठी कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी मुघलशाहीकडे जात होती. रयतेच्या कल्याणाचे देणंघेणं कुणालाही नव्हतं. आज शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येतायेत. महाराष्ट्राचे प्रश्न समोर येतायेत. राज्याचा स्वाभिमान डिवचला जातोय पण काही मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय हे विचारण्याचे धाडस नाही कारण वतन वाचवायचे आहे अशी परिस्थिती नाही ना...अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. 

बारामती इथं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सभेला कोल्हे संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, वाघ आपल्याला लय आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होतात. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभं राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात. कारण या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला. 

तसेच मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही. कारण पुन्हा येईन म्हटलं की अडीच वर्षांनी येता येतंय. अडीच वर्षाने आल्यानंतर तेदेखील अर्धच येता येते. आणि काही दिवसांनी अर्ध्याच्याही अर्ध होतंय. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणार नाही. बारामतीत आज माझे स्वागत केले त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे. सुप्रिया सुळेंना संसदेत वावरताना बघतो तेव्हा मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा महाराष्ट्राचा वारसा आणि वसा समर्थ हातात आहे याची खात्री पटते. मधल्या काळात ज्या घडामोडी झाल्या त्यात २ पर्याय होते. एक दडपशाहीसमोर गुडघे टेकण्याचा होता, गुडघे टेकले असते तर नक्कीच फायदा झाला असतो. स्वार्थ साधला गेला असता. पण दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाहीत तर ताठ मानेने संघर्ष करायचा. संघर्षाची वाट असते तेव्हा नजरेला नजर भिडवून स्वाभिमानाने त्याला सवाल विचारता येतो. हा सवाल विचारण्याचा मार्ग सुप्रिया सुळे आणि मी निवडला आहे असं अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवारांची एक ताकद शक्ती पाठीमागे उभी आहे. ज्या मातीने संपूर्ण देशाला भूषण वाटावा असं रत्न दिला. त्या बारामतीच्या मातीसमोर मी नतमस्तक होतो आणि उरलेले पुण्याच्या सभेत दिलखुलास बोलेन. शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकण्यासाठी पुण्यातील सभेला तुम्ही उपस्थित राहावे असं आवाहन कोल्हे यांनी उपस्थितांना केले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस