शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

Sanjay Raut PC: भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; संजय राऊतांच्या विधानानं चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:07 IST

ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप राऊतांनी केला.

नागपूर – आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा भगवा झेंडा महाराष्ट्रात फडकल्याशिवाय राहणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी नागपूरात प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचा भगवा झेंडा आहे की नाही हे माहिती नाही. परंतु शिवसेनेचा भगवा झेंडा आहे. भगव्याचा झेंडा आणि दांडा फक्त शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडीत असलो तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं राऊतांनी ठणकावून सांगितले आहे.

त्याचसोबत भारतीय जनता पक्ष २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणेल या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांनीही सूचक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) भाजपाचे राज्यातील नेते आहेत. स्वबळावर लढायचं की नाही ते त्यांनी ठरवावं. भविष्यात आमच्यावरही स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले.

विधिमंडळात पेनड्राईव्ह देणे त्याला बॉम्ब मानत नाही

माझ्यासारख्या माणसाला ईडीचं भय दाखवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या कुटुंबावर धाडी टाकल्या. पण काय मिळालं? ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत. त्यांना वापरलं जात आहे. आम्ही झुकणार नाही. शिवसेनेला वाकवू शकत नाही. महाविकास आघाडीला हात लावू शकत नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. ज्याची भीती आणि दहशत दोन्ही असते. मी हजारोंच्या साक्षीने ईडीच्या भ्रष्टाचाराचं १३ पानी पुराव्यासह पत्र दिले. ईडीचे अधिकारी ६०-७० बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्या हा बॉम्ब नाही का? विधिमंडळात पेनड्राइव्ह पुरावे देणे त्याला बॉम्ब मानत नाही असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

भाजपा सूडाचं राजकारण करतंय

आमच्या नेत्यांना अडकवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत आहे. नवाब मलिक मंत्रिमंडळात राहणारच आहे. तुमच्याकडे केंद्रीय यंत्रणा तर महाराष्ट्र पोलीसही आता काम करत आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. तपास सुरू झाला आहे. महाराष्ट्र पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहे. लवकरच भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील. अनिल देशमुखांबाबत घाईघाईनं राजीनाम्याचा निर्णय झाला असं मला वाटतं. ईडी,सीबीआय धाडी टाकल्या जातात. देशभरात भाजपा सूडाचं राजकारण करत आहे. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. मी १०० च्या वर प्रकरणं ईडीकडे पाठवली आहेत. ईडीनं गेल्या ७ वर्षात हजारो कारवाया केल्या त्यातील १९ लोकांवरच आरोप सिद्ध झालेत. तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पडणार नाही असा इशाराही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस