शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Sanjay Raut PC: भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; संजय राऊतांच्या विधानानं चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:07 IST

ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप राऊतांनी केला.

नागपूर – आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा भगवा झेंडा महाराष्ट्रात फडकल्याशिवाय राहणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी नागपूरात प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचा भगवा झेंडा आहे की नाही हे माहिती नाही. परंतु शिवसेनेचा भगवा झेंडा आहे. भगव्याचा झेंडा आणि दांडा फक्त शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडीत असलो तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं राऊतांनी ठणकावून सांगितले आहे.

त्याचसोबत भारतीय जनता पक्ष २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणेल या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांनीही सूचक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) भाजपाचे राज्यातील नेते आहेत. स्वबळावर लढायचं की नाही ते त्यांनी ठरवावं. भविष्यात आमच्यावरही स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले.

विधिमंडळात पेनड्राईव्ह देणे त्याला बॉम्ब मानत नाही

माझ्यासारख्या माणसाला ईडीचं भय दाखवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या कुटुंबावर धाडी टाकल्या. पण काय मिळालं? ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत. त्यांना वापरलं जात आहे. आम्ही झुकणार नाही. शिवसेनेला वाकवू शकत नाही. महाविकास आघाडीला हात लावू शकत नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. ज्याची भीती आणि दहशत दोन्ही असते. मी हजारोंच्या साक्षीने ईडीच्या भ्रष्टाचाराचं १३ पानी पुराव्यासह पत्र दिले. ईडीचे अधिकारी ६०-७० बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्या हा बॉम्ब नाही का? विधिमंडळात पेनड्राइव्ह पुरावे देणे त्याला बॉम्ब मानत नाही असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

भाजपा सूडाचं राजकारण करतंय

आमच्या नेत्यांना अडकवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत आहे. नवाब मलिक मंत्रिमंडळात राहणारच आहे. तुमच्याकडे केंद्रीय यंत्रणा तर महाराष्ट्र पोलीसही आता काम करत आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. तपास सुरू झाला आहे. महाराष्ट्र पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहे. लवकरच भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील. अनिल देशमुखांबाबत घाईघाईनं राजीनाम्याचा निर्णय झाला असं मला वाटतं. ईडी,सीबीआय धाडी टाकल्या जातात. देशभरात भाजपा सूडाचं राजकारण करत आहे. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. मी १०० च्या वर प्रकरणं ईडीकडे पाठवली आहेत. ईडीनं गेल्या ७ वर्षात हजारो कारवाया केल्या त्यातील १९ लोकांवरच आरोप सिद्ध झालेत. तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पडणार नाही असा इशाराही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस