शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बाँडवर शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:04 IST

Maharashtra Political Crisis: काहींनी पक्षावरील निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. मात्र, आता शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडून लिहून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेला सुरुंग लागल्याचे दिसत आहे. कारण बाँडवर शपथपत्र करून देणारे पदाधिकारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी एकीकडे तर सायंकाळी दुसऱ्या गटात पाहायला मिळत आहे. अशात शिवसेनेच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बाँड शपथपत्र लिहून घेतले जात आहे. आता शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'  केला जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नेतृत्वावर आम्ही नाराज असल्याचे कारण देत शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  

अचानक शिंदे गटात सामील झाले

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेक शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती. तर काहींनी आपली निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी सुद्धा असेच शपथपत्र  बाँडवर लिहून दिले होते. सोबतच आपण शिवसेनेसोबतच असणार असल्याचे लिहून दिले होते. मात्र आता अचानक ते शिंदे गटात सामील झाले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता टोकाला गेले असून, वरच्या पातळीवर सुरु असलेला संघर्ष आता स्थनिक पातळीवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणतेही संधी दोन्ही गटातील नेते सोडत नाही. त्यातच दोन्ही गटांकडून मेळाव्याला मेळाव्यातून उत्तर दिले जात असल्याचे चित्र औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवाजीनगरमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगचेच शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी मेळावा घेतला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे