शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बाँडवर शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:04 IST

Maharashtra Political Crisis: काहींनी पक्षावरील निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. मात्र, आता शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडून लिहून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेला सुरुंग लागल्याचे दिसत आहे. कारण बाँडवर शपथपत्र करून देणारे पदाधिकारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी एकीकडे तर सायंकाळी दुसऱ्या गटात पाहायला मिळत आहे. अशात शिवसेनेच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बाँड शपथपत्र लिहून घेतले जात आहे. आता शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'  केला जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नेतृत्वावर आम्ही नाराज असल्याचे कारण देत शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  

अचानक शिंदे गटात सामील झाले

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेक शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती. तर काहींनी आपली निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी सुद्धा असेच शपथपत्र  बाँडवर लिहून दिले होते. सोबतच आपण शिवसेनेसोबतच असणार असल्याचे लिहून दिले होते. मात्र आता अचानक ते शिंदे गटात सामील झाले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता टोकाला गेले असून, वरच्या पातळीवर सुरु असलेला संघर्ष आता स्थनिक पातळीवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणतेही संधी दोन्ही गटातील नेते सोडत नाही. त्यातच दोन्ही गटांकडून मेळाव्याला मेळाव्यातून उत्तर दिले जात असल्याचे चित्र औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवाजीनगरमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगचेच शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी मेळावा घेतला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे