शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:11 IST

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच, दुसरीकडे पर्यावरण विभागाने सण-उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच, दुसरीकडे पर्यावरण विभागाने सण-उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, पीओपीसह पाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावांतच विसर्जित करण्यात याव्यात. याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावे, तसेच सण-उत्सव पर्यावरणपूरक साजरे करावे, असे आवाहन पर्यावरण विभागाने केले आहे.पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भातील मार्गदर्शक  सूचनांचे पत्र पाठविले आहे. त्यातील सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात यावे, असे नमूद आहे. त्यानुसार, पीओपीचे मूर्तीचे उत्पादक आणि विक्रेत्यांनी मूर्ती विकताना त्याच्या मागील बाजूस ऑइल पेंटने लाल रंगाचे गोल आकाराचे चिन्ह करावे. मूर्तिकार आणि विक्रेत्यांना मूर्तीची विक्री करताना नोंदवही बंधनकारक आहे, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.पालिकांनी सार्वजनिक मंडळांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करायचा आहे. पीओपी मूर्ती आहे की नाही, याची माहिती घेत, विसर्जनाचा आराखडा, व्यवस्था तयार करायचा आहे. मंडळांनी मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास या मूर्तीच्या विसर्जनासाठी प्रतीकात्मक स्वरूपात लहान मूर्तीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, तसेच प्रतिष्ठापना केलेल्या मोठ्या मूर्तीचा वापर पुढील वर्षी करण्याचे आवाहन या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आले आहे.

...तर नैसर्गिक स्रोतात विसर्जनास परवानगीमंडळांकडे पाच फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी इतर कोणताही पर्याय नसेल, तर या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याची परवानगी असेल. मात्र, या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने पालिकेने दुसऱ्या दिवशी विसर्जित साहित्य गोळा करत, विल्हेवाट लावावी. नैसर्गिक जलस्रोताची सफाई करावी, असे सूचनांमध्ये नमूद आहे.

स्वराज्य संस्थांवर जबाबदारीपालिकांनी कृत्रिम तलावांची जनजागृती करावी. कृत्रिम तलावातील त्याच ठिकाणी चुन्याच्या किंवा तुरटीच्या मदतीने प्रक्रिया करून हे पाणी शुद्धीकरण केंद्राकडे पाठवावे. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होईल, याची खबरदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यायची आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र