शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 19:55 IST

राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई - सरकारच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून शेतकरी, एसटी कर्माचारी यांच्यानंतर राज्य सरकारी कर्मचारीही संपावर गेले आहेत त्यामुळे राज्यभरातील सरकारी कार्यालयातील काम कामकाज ठप्प झाले. राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचा-यांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील मागणी राज्य शासनाकडे प्रलंबीत आहे. या सदर्भात वेळोवेळी कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी मागण्या केलेल्या आहेत आंदोलनेही केली आहेत. पण सरकारने आश्वासनाशिवाय कर्मचा-यांना काहीही दिले नाही. मी स्वतः या संदर्भात 9 जानेवारी 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने सरकारने याकडे लक्ष दिले नाही. आता सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांनी तीन दिवसांचा राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज संपाच्या दुस-या दिवशीही मंत्रालयासह राज्यातील बहुतांशी सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्माचारी संपात सहभागी असल्याने राज्यभरातील शाळा बंद आहेत वैद्यकीय सेवेवरही संपाचा परिणाम झाला आहे. संपकरी कर्मचा-यांशी चर्चा करून संपावर तोडगा काढण्याऐवजी सरकार कारवाईच्या धमक्या देत आहे. सरकारच्या आडमुठेपणामुळे अगोदरच मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. आताही सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ संपकरी कर्मचा-यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

सरकारचा जनतेशी संवाद राहिला नाही त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. समाजातील प्रत्येक वर्ग रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलने करित आहे. पण आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी सरकारमध्ये बसलेले लोक बेताल वक्तव्ये करून आंदोलन चिघळवण्याचाच प्रयत्न करित आहे. सरकारने आडमुठेपणा सोडून आंदोलकांशी चर्चा करावी व तोडगा काढावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसGovernmentसरकारEmployeeकर्मचारीStrikeसंप