शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 19:55 IST

राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई - सरकारच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून शेतकरी, एसटी कर्माचारी यांच्यानंतर राज्य सरकारी कर्मचारीही संपावर गेले आहेत त्यामुळे राज्यभरातील सरकारी कार्यालयातील काम कामकाज ठप्प झाले. राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचा-यांकरिता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील मागणी राज्य शासनाकडे प्रलंबीत आहे. या सदर्भात वेळोवेळी कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी मागण्या केलेल्या आहेत आंदोलनेही केली आहेत. पण सरकारने आश्वासनाशिवाय कर्मचा-यांना काहीही दिले नाही. मी स्वतः या संदर्भात 9 जानेवारी 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने सरकारने याकडे लक्ष दिले नाही. आता सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांनी तीन दिवसांचा राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज संपाच्या दुस-या दिवशीही मंत्रालयासह राज्यातील बहुतांशी सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्माचारी संपात सहभागी असल्याने राज्यभरातील शाळा बंद आहेत वैद्यकीय सेवेवरही संपाचा परिणाम झाला आहे. संपकरी कर्मचा-यांशी चर्चा करून संपावर तोडगा काढण्याऐवजी सरकार कारवाईच्या धमक्या देत आहे. सरकारच्या आडमुठेपणामुळे अगोदरच मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. आताही सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ संपकरी कर्मचा-यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

सरकारचा जनतेशी संवाद राहिला नाही त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. समाजातील प्रत्येक वर्ग रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलने करित आहे. पण आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी सरकारमध्ये बसलेले लोक बेताल वक्तव्ये करून आंदोलन चिघळवण्याचाच प्रयत्न करित आहे. सरकारने आडमुठेपणा सोडून आंदोलकांशी चर्चा करावी व तोडगा काढावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसGovernmentसरकारEmployeeकर्मचारीStrikeसंप