शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संतांची भ्रमंती आणि साहित्याची निर्मिती

By admin | Updated: April 2, 2015 03:14 IST

नवनाथ आणि चौऱ्याऐंशी सिद्ध महात्म्यांनी अखंड देशयात्रा केल्या. नाथांच्या नजीकच्या काळातील महात्मा चक्रधर हे मूळचे गुजरातेतील भडोचचे

नाथ महानुभक्तांचा भारतसंचार भारतीय भक्तिसाहित्यात समन्वयशीलता आणि यात्राधर्म हे मराठी संतपरंपरेचे दोन ठळक विशेष सांगता येतात. महानुभाव, नाथ, वारकरी, रामदासी इत्यादी संप्रदायांतील महापुरुषांनी लोकभाषा, लोकछंद आणि लोकमाध्यमांचा स्वीकार तर केलाच; पण त्याबरोबर लोकसंपर्कासाठी त्यांनी नित्य यात्रा केल्या. प्रवास केले. लोकवाणी हिंदी स्वीकारली. नाथसंप्रदायाचे प्रभावी प्रसारक गोरक्ष यांनी भारतभर भ्रमण केले. ते मूळचे महाराष्ट्राचे असावेत, हे सप्रमाण मांडले गेले आहे. नवनाथ आणि चौऱ्याऐंशी सिद्ध महात्म्यांनी अखंड देशयात्रा केल्या. नाथांच्या नजीकच्या काळातील महात्मा चक्रधर हे मूळचे गुजरातेतील भडोचचे. ते महाराष्ट्रात विदर्भाच्या ऋद्विपूरकडे आले. त्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. नाथांचे समकालीन महात्मा बसवेश्वर. त्यांनी आजच्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मोठे समाजप्रबोधनाचे कार्य केले.आद्य मराठी ग्रंथ म्हणून गौरविला जाणारा ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ चक्रधरांच्या व्यापक लोकसंपर्काचा आणि प्रवासाचा परिपाक आहे. त्यांनी अखेरशेवटी ‘उत्तरांपथे गमन’ केले अशी महानुभावीय धारणा आहे. चक्रधरांचे अनुयायी पुढे उत्तरेत गेले. काबूल-कंदाहारपर्यंत पोहोचले. तिथे त्यांनी मराठी ही ‘धर्मभाषा’ म्हणून जनतेसमोर ठेवली. ज्ञानदेवादींची काशीयात्रानेवासे येथे श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाची परिसमाप्ती केल्यानंतर ज्ञानदेवादी भावंडे आणि संत नामदेवरायासह इतर संतांचा मेळा वाराणसीकडे यात्रेसाठी गेला. नामदेवांची तीर्थावळीही या प्रवासावर चांगला प्रकाश टाकते. संत एकनाथांनी गुरू जनार्दनस्वामींच्या आज्ञेवरून दीर्घयात्रा केल्या. देशावलोकन केले. ते पुढे वाराणसीत तीन वर्षे राहिले. नाथांच्या रुक्मिणी स्वयंवराची रचना त्यांच्या काशीनिवासाच्या काळात झालेली आहे. या ग्रंथाच्या प्रतीही उत्तरेत मिळालेल्या आहेत. कबीरगुरू रामानंद हे दक्षिणेतून बहुधा महाराष्ट्रमार्गे उत्तरेकडे गेले. शंकराचार्य, रामानुज, निंबार्क, मध्व असे सारेच आचार्य दक्षिणेत झाले. ते नंतर उत्तर भारतातही लोकमान्य झाले. शंकराचार्यांनी लिहिलेले पंढरीच्या पांडुरंगाचे स्तोत्र सर्वश्रुत आहे. चैतन्य महाप्रभू मुख्यत: बंगाल-ओरिसात वावरले. ते पंढरपूरला येऊन गेल्याचे काही पुरावे देता येतात. रामदासांचे देशाटन समर्थ रामदासांनी भरपूर देशयात्रा केली. ‘परचक्र निरुपण’ वर्णून ठेवले. इ. स. १६२२ ते १६४४ या काळात उत्तरेकडे वावरले. नंतर १६४४ ते १६५६ ते कृष्णा खोऱ्यात फिरले. रामदासांनी देशात अनेक ठिकाणी एकूण अकराशे मठ स्थापन केल्याचे सांप्रदायिक सांगतात. आज त्यापैकी एकूण सत्तर मठ अस्तित्वात आहेत. तंजावरचाही रामदासी मठ आणि त्याने राखलेली हस्तलिखिते नोंद घेण्यासारखी आहेत. ग्वाल्हेर-इंदूर भागातील रामदासी मठांचे कार्य प्रशंसनीय आहे. सहावे शीख गुरू हरगोविंद आणि समर्थ रामदास यांची प्रत्यक्ष भेट घडली. पुढे रामदासांच्या कार्याला ऐतिहासिक वळण मिळाले, हे अनेक प्रमाणांसह स्पष्ट केले गेले आहे. महाराष्ट्रातून जसे भक्त महंत अन्यत्र गेले, तसे इतर प्रांतातून महाराष्ट्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोण आले याचा अभ्यास करायला हवा. (लेखक संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)