शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

लढायचं असेल तर ताकदीनं लढा, हे काय...; एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 19:49 IST

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील असं खडसेंनी म्हटलं.

जळगाव - सत्तेचा दुरुपयोग करत नियमांची तोडफोड करुन राजकारण केलं जात आहे. लढायचं असेल ताकदीने लढा, हे काय घाणेरड्या पद्धतीने बच्चो बच्चो राजकारण तुम्ही खेळताहेत असं म्हणत एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून पुन्हा विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला.  

एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवायची असल्याचा निर्णय झाला असून यासाठी ४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारांचा आमच्या बाजूने मोठा प्रतिसाद आहे. ४५१ पैकी ४४८ सभासदांची मी स्वत: बोललो आहे. सध्यस्थितीत विरोधकांकडून जे राजकारण चाललं आहे याविषयी जनतेमध्ये मोठी चीड आहे. मंत्री, आमदार खासदार असतांनाही जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरु आहे असं सांगत त्यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. 

तसेच जिल्हा दूध संघात भ्रष्टाचार दिसत असेल, तर फॉरेन्सिक ऑडिट करा, माझी तयारी आहे. यात जे निष्पन्न होईल त्याआधारे कारवाई करा. निवडणुका पाहूनच जिल्हा दूध संघातल प्रकरण समोर आणलं.  याला अटक करणं, त्याला अटक करणं, कशाला करताहेत, ताकद असेल ताकदीने निवडणूक लढा असं आव्हान एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं.

संजय पवार म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी नव्हेराष्ट्रवादीचे संजय पवार हे विरोधकांकडून जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवित असल्याची चर्चा आहे, यावर एकनाथ खडसेंनी त्यांच मत व्यक्त केले. एकटे संजय पवार हे सोडून गेले म्हणून संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष तिकडे गेला असा अर्थ होत नाहीये. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली. तर यावर बोलतांना माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनीही पवार यांना टोला लगावला आहे. त्याला जिकडे जायंच, जाऊद्या, त्यांना त्यांचे विचार पटले असतील, म्हणून ते गेले असतील, पण राष्ट्रवादीला बदनाम करु नये, असा टोला डॉ सतीश पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा एकसंघ असल्याचे जरी सांगितले जात असले तरी दरम्यान यावरुन जिल्हा संघाच्या निवडणुकीत संजय पवार विरोधकांना जावून मिळाल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे बोलले जात आहे.

गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधी घडलं नाहीजितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील मात्र जितेंद्र आव्हाड यांना त्रास देण्यासाठी छळ करण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात अनुभव येत आहे. अगदी गलिच्छ राजकारण, घाणेरडं राजकारण यापूर्वी महाराष्ट्रात कधी घडलं नाही असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला. शरद पवारांनी आधार दिलागेल्या चाळीस वर्षापासून एकनाथ खडसे राजकारणात आहे. मला एकटे पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, भाजपने मला उमेदवारी दिली नाही, पण शरद पवार यांनी आधार दिला आहे. मी आमदार आहे, मला काय एकाकी पाडतील, कितीही एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, तर जनता माझ्यासोबत आहे. यांनी तर जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक बुडवल्या होत्या त्यांचा विकास मी केला, आताही यांचा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत हेतू स्वच्छ नाही. यांना त्यातून काही तरी कमवायचं आहे असा आरोप खडसेंनी विरोधकांवर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा