शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेत; संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:05 IST

खूप दिवस झाले भोसरीत मेळावा घ्यायचं प्लॅनिंग होतं. इथं स्टेजवर मोठी गर्दी आहे परंतु या भागात आपला एकही नगरसेवक नाही.

ठळक मुद्देस्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने ३ नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत सत्ता आपली येईल. नुसतं पद आहे म्हणून नव्हे तर शिवसैनिकांच्या मनगटात ताकद होती म्हणून महाराष्ट्रात आपली सत्ता अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत

पुणे – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी यातील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. अजित पवारांना(Ajit Pawar) सांगू आमचं ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत असं जाहीर विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी व्यासपीठावरुन केले. त्यामुळे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना-भाजपा कधीही एकत्र येऊ शकतात याचे संकेत दिले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये मेळाव्यावेळी राऊत म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री आपले आहेत. अजितदादाही मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत असं त्यांनी विधान करताच सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर राऊत यांनी विधानावर विनोदी शैलीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका मग लिहा. उगाच ब्रेक्रिंग सुरू होईल. दिल्लीचे अंदाज बांधायला लागतील. आपल्याला दिल्लीवर राज्य करायचं. दिल्लीत ऑफिस कुठं आहेत. पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असं त्यांनी म्हटलं.

पुढील महापौर आपलाच

खूप दिवस झाले भोसरीत मेळावा घ्यायचं प्लॅनिंग होतं. इथं स्टेजवर मोठी गर्दी आहे परंतु या भागात आपला एकही नगरसेवक नाही. त्यामुळे स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने ३ नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत सत्ता आपली येईल. पुढील काळात पिंपरी चिंचवडचा महापौर आपलाच असेल. नुसतं पद आहे म्हणून नव्हे तर शिवसैनिकांच्या मनगटात ताकद होती म्हणून महाराष्ट्रात आपली सत्ता आली असंही राऊत यांनी सांगितले.

...अन्यथा स्वबळावर लढणार

मागील वेळी ४ प्रभाग होते तेव्हा आपल्याला फटका बसला मात्र इतरांना तो बसला नाही. म्हणजे आपलं संघटन कुठेतरी कमी पडतंय. परंतु आता आपल्याला सगळ्या जागा लढण्याची सवय ठेवली पाहिजे. आले तर तुमच्यासोबत नाही आले तर तुमच्याशिवाय असं अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला इशारा दिला आहे. त्याचसोबत कोल्हापूरचा गडी पुण्यात आलाय पण त्याने आमच्या नादी लागू नये असंही राऊतांनी चंद्रकांना पाटलांना म्हटलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस