शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कामे केली असतील तर दुष्काळ जाहीर का केला? राज ठाकरेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 17:18 IST

राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

ठाणे : राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. एवढी कामे केली असतील तर राज्य सरकारला दुष्काळ जाहीर का करावा लागला, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुमच्या सरकारमध्ये सिंचनाची काय कामं झाली, पैसा कुठे गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वातावरणाचे वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. दुष्काळ दौऱ्यावर जाणार का, या प्रश्नावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. दुष्काळाची करुण परिस्थिती असते. दुष्काळी टुरिझम करण्यात अर्थ नाही, माझ्या हातात काही गोष्टी असत्या तर काही करू शकलो असतो. नुसतंच जायचं आणि बघून यायचं याला काय अर्थ आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीची माहीती घेत असल्याचे राज म्हणाले. 

तसेच राज्यातील टँकर लॉबी कोणाच्या आहेत ते तपासून घ्या. इथून बसून सारे काही दिसत नसते. त्यामागचे राजकीय कनेक्शन काय, राजकारणी, आमदार, खासदार जर टँकर लॉबीच्या मागे असतील तर ते त्यांचा धंदा चालविण्यासाठी पाणी येऊच देणार नाहीत. दुष्काळासाठी पाणी फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करतायत. 

दुष्काळासाठी पाणी फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करत आहेत. अमीर खान चांगलं काम करत त्यांचं अभिनंदन सर्व जण करतायत, सरकार काय करतंय असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र