शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

कामे केली असतील तर दुष्काळ जाहीर का केला? राज ठाकरेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 17:18 IST

राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

ठाणे : राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. एवढी कामे केली असतील तर राज्य सरकारला दुष्काळ जाहीर का करावा लागला, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुमच्या सरकारमध्ये सिंचनाची काय कामं झाली, पैसा कुठे गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वातावरणाचे वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. दुष्काळ दौऱ्यावर जाणार का, या प्रश्नावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. दुष्काळाची करुण परिस्थिती असते. दुष्काळी टुरिझम करण्यात अर्थ नाही, माझ्या हातात काही गोष्टी असत्या तर काही करू शकलो असतो. नुसतंच जायचं आणि बघून यायचं याला काय अर्थ आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीची माहीती घेत असल्याचे राज म्हणाले. 

तसेच राज्यातील टँकर लॉबी कोणाच्या आहेत ते तपासून घ्या. इथून बसून सारे काही दिसत नसते. त्यामागचे राजकीय कनेक्शन काय, राजकारणी, आमदार, खासदार जर टँकर लॉबीच्या मागे असतील तर ते त्यांचा धंदा चालविण्यासाठी पाणी येऊच देणार नाहीत. दुष्काळासाठी पाणी फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करतायत. 

दुष्काळासाठी पाणी फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करत आहेत. अमीर खान चांगलं काम करत त्यांचं अभिनंदन सर्व जण करतायत, सरकार काय करतंय असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र