शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाँग दिवाळी विकेंड प्लॅन करत असाल तर या शहरांचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:15 IST

आज आम्ही तुम्हाला भारतातील काही शहरांविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे त्या शहरात दिवाळीत काय खास असतं याची माहिती तुम्हाला मिळेल

ठळक मुद्देजर तुम्हाला सणसमारंभात शॉपिंग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही राजस्थानमधील या शहरात जाऊ शकता.या काळात हे मंदिर संपूर्णपणे रोषणाईने सजवलेले असतं.इथे नदीवर तरंगते दिवे लावण्यात येतात.ज्यामुळे संपूर्ण शहर दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघते.

शाळा, कॉलेजमध्ये दिवाळीची सुट्टी लागली की मुलांना वेध लागतात ते फिरायचे. यंदा तर शुक्रवार ते रविवार अशी मोठी सुट्टी मिळाल्याने फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग  सुरु आहे. निदान एक दिवसाची तरी ट्रीप व्हायलाच हवी अशी प्रत्येक घरातून ओरड सुरू होते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्यापल्या परिने विविध शहरात दिवाली साजरी करण्यासाठी जात असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही शहरांविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे त्या शहरात दिवाळीत काय खास असतं याची माहिती तुम्हाला मिळेल, त्यानुसार तुम्ही सुट्टीसाठी तुमच्या पिकनीकचं प्लॅनिंग करू शकता.

जयपूर, राजस्थान

जर तुम्हाला सणसमारंभात शॉपिंग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही राजस्थानमधील जयपूर शहरात जाऊ शकता. जयपूर ट्रेड युनिअनमार्फत दिवाळीत विविध शॉपिंग प्रदर्शन, शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केले जातात. जयपूरमधल्या वैशाली नगर, नेहरू बाझार, चौरा रस्ता, राजा पार्क, जयंती बाझार, चंडपोले बाझार या ठिकाणी हे शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केले जातात.

अमृतसर, पंजाब

दिवाळीसाठी सगळ्यात बेस्ट प्लेस म्हणून अमृतसरचीच निवड कित्येक भटकंतीप्रेमी करत असतात. अमृतसरमधील गोल्डन टेम्पलमध्ये दिवाळीत एकदा भेट द्यायलाच हवी. अमृतसरमधील शीख बांधव दिवाळीच्या काळातच बंदी छोर दिवस म्हणूनही साजरा केला जातो. गोल्डन टेम्पल या काळात संपूर्णपणे रोषणाईने सजवलेले असतं.

वाराणसी

जर तुम्हाला दिवाळी अगदी पारंपारिक पद्धतीने साजरी करायची असेल तर तुम्ही वाराणसीमध्ये एकदा भेट द्याच. वाराणसी नदीच्या किनाऱ्यावर दिवाळीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. वाराणसी नदीवर तरंगते दिवे लावण्यात येतात.ज्यामुळे संपूर्ण वाराणसी दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघते.

कोलकाता

कोलकात्यात फार वेगळ्या पद्धतीची दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या काळात देवी कालीमाताची आराधना केली जाते. आपल्यात नवरात्री उत्सवाची जेवढी उत्साह असतो तसाच उत्साह येथे दिवाळीच्या काळात पाहायला मिळतो.

गोवा

इतर सणांप्रमाणे दिवाळी सणासाठी अनेकजण गोवा शहराची निवड करत असतात. नरकासुराचा पुतळा जाळून गोव्यात दिवाळी साजरी केली जाते.

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपरा