शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या!" आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 18:07 IST

भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या!" अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप, आज काँग्रेसव्याप्त होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या जनसंवाद मेळव्यात केली होती. एवढेच नाही, तर भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल, असे भाकीतही त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता, "त्या श्रीमान उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे काय होईल, आमचे अध्यक्ष कोण होईल याची चिंता करु नये. भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या!" अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेला यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

एक जंताची गोळी घ्या! -शेलार यांनी सोशल मीडिया 'X' वर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "मूळ शिवसैनिक नसलेल्या बाहेरून आलेल्या संजय राऊत यांना घेऊन ज्यांनी आपल्या पक्षाचे "राष्ट्रवादी" केले. उलटे सूर्य नमस्कार घालणाऱ्या भास्कर जाधव यांना घेऊन पक्षाच्या दुर्दैवाचे दशावतार केले. बाहेरून आलेल्या सुषमा अंधारेंना घेऊन आपल्या पक्षाची "समाजवादी सेना" केली. बाहेरून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना घेऊन आपल्या पक्षाला "पेज थ्री" केले. बाहेरून आलेल्या आदेश बांदेकर यांना घेऊन आपल्या पक्षाचा "होम मिनिस्टर शो" केला. त्या श्रीमान उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे काय होईल, आमचे अध्यक्ष कोण होईल याची चिंता करु नये... भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या! जंतापासून मुक्त, सशक्त राजकीय भविष्य?" असे शेलार यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे -उद्धव ठाकरे म्हणाले होते, "केंद्रातील भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने, देशातील विरोधी पक्षांना फोडण्याचे काम मोदी शहा करीत आहेत. कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे व ते भाजपच्या संपर्कात असल्याचे ऐकायला मिळत आहे. यामुळे कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त होत आहे." एवढेच नाही, तर, "भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल," असे भाकीतही उद्धव ठाकरे यांनी करून टाकले होते.

शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चोरांच्या हातात दिला, आता काँग्रेसही देणार का? -यावेळी, निवडणूक आयोगाने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चोरांच्या हातात दिला. आता अशोक चव्हाणांच्या निमित्ताने काँग्रेसही देणार का? असा जाहीर सवालही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. तसेच, "देशात सगळीकडे एकाधिकारशाही दिसून येत असून दहा वर्षात भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्ती केली नाही. भाववाढ, महागाईने जनता त्रस्त आहे, मात्र केंद्रातले सरकार स्वार्थी वृत्तीने विरोधी पक्षांना फोडण्यात गुंग आहे. भाजपाने मतांचा बाजार लावला असून विरोधी पक्षाच्या फोडाफोडीने स्व: पक्षातील निष्ठावंतावर अन्याय होत आहे, हे देखील भाजप विसरत आहे. तसेच या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पहायला वेळ नाही, शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून बळीराजा कर्जबाजारी होत आहे. मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी," असे आव्हानही ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला केले होते.

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण