शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 05:45 IST

केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा (जि. पालघर) : आदिवासी हे येथील मूळ रहिवासी असून, त्यांच्या जागा उद्योजकांनी ताब्यात घेतल्या आहेत. आमचे सरकार आल्यास सहा महिन्यांतच आदिवासींच्या जागा त्यांना परत करू, अशी गॅरंटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दिली. याचबरोबर वनखात्याची जमीन तसेच जंगलावर आदिवासींचाच अधिकार असेल, ही आम्ही गॅरंटी देतो, असेही ते म्हणाले. 

पालघर जिल्ह्यातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सुरुवात शुक्रवारी सकाळी मोखाडा येथून करण्यात आली. त्यानंतर जव्हार, विक्रमगड व नंतर वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे राहुल गांधी यांनी जनतेशी संवाद साधला. भारतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त गरिबीचे प्रमाण असून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक वर्षाला गरीब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये देऊन गरिबी हटवण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

‘अग्निवीर’वर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने जवानांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले आहे, तर चीनच्या जवानांना पाच वर्षे प्रशिक्षण दिले जाते. या दोघांमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षणवाला की पाच वर्षांचा प्रशिक्षणवाला टिकेल, असा सवाल त्यांनी नागरिकांना विचारला.  

शेतकरी-आदिवासींची कर्जे माफ केली? 

- केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला. 

- भिवंडी, वाडा, मनोर, कुडूस या नाक्यांवर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४