शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
2
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
3
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
4
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
5
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
6
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
7
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
8
Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
9
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
10
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
11
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
12
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
14
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
15
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
16
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
17
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
18
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
19
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
20
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:30 IST

Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ...

Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड दिसणार असल्याचे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार आले असते, असं संजय गायकवाड म्हणाले.

हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारला धारेवर धरुन निर्णय मागे घ्यायला लावणाऱ्या ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळाला साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे २० वर्षांनी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मराठीच्या मु्द्द्यावरुन ठाकरे बंधूंनी सरकारवर टीकास्त्र डागलं. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. या मेळाव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही - संजय गायकवाड

"पंधरा वर्षे आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरे सोडून गेले. त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात फार पडत पडेल असे वाटत नाही. आता ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता आणि किती लोकांचे काम करता याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असतात तर बाळासाहेब जिवंत असताना २८८ आमदार निवडून आले असते. बाळासाहेब असताना पण आपण ७० ते ७४ आमदारांच्या पुढे कधी गेलेलो नाही," असं विधान संजय गायकवाड यांनी केले.

दहशतवाद ओळखायचा असेल तर उर्दू भाषा आली पाहिजे

"विषय फक्त हिंदीचा नाही. जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले. ते मुर्ख होते का? तसेच छत्रपती शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे," असंही संजय गायकवाड म्हणाले.

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे