शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:30 IST

Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ...

Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड दिसणार असल्याचे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार आले असते, असं संजय गायकवाड म्हणाले.

हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारला धारेवर धरुन निर्णय मागे घ्यायला लावणाऱ्या ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळाला साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे २० वर्षांनी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मराठीच्या मु्द्द्यावरुन ठाकरे बंधूंनी सरकारवर टीकास्त्र डागलं. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. या मेळाव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही - संजय गायकवाड

"पंधरा वर्षे आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरे सोडून गेले. त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात फार पडत पडेल असे वाटत नाही. आता ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता आणि किती लोकांचे काम करता याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असतात तर बाळासाहेब जिवंत असताना २८८ आमदार निवडून आले असते. बाळासाहेब असताना पण आपण ७० ते ७४ आमदारांच्या पुढे कधी गेलेलो नाही," असं विधान संजय गायकवाड यांनी केले.

दहशतवाद ओळखायचा असेल तर उर्दू भाषा आली पाहिजे

"विषय फक्त हिंदीचा नाही. जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले. ते मुर्ख होते का? तसेच छत्रपती शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे," असंही संजय गायकवाड म्हणाले.

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे