शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
4
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
5
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
6
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
7
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
8
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
9
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
10
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
11
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
12
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
13
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
14
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
15
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
16
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
17
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
18
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
19
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
20
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:30 IST

Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ...

Sanjay Gaikwad on Thackeray Brand: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड दिसणार असल्याचे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार आले असते, असं संजय गायकवाड म्हणाले.

हिंदी भाषेच्या निर्णयावरुन सरकारला धारेवर धरुन निर्णय मागे घ्यायला लावणाऱ्या ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळाला साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे २० वर्षांनी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मराठीच्या मु्द्द्यावरुन ठाकरे बंधूंनी सरकारवर टीकास्त्र डागलं. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. या मेळाव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही - संजय गायकवाड

"पंधरा वर्षे आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरे सोडून गेले. त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात फार पडत पडेल असे वाटत नाही. आता ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता आणि किती लोकांचे काम करता याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असतात तर बाळासाहेब जिवंत असताना २८८ आमदार निवडून आले असते. बाळासाहेब असताना पण आपण ७० ते ७४ आमदारांच्या पुढे कधी गेलेलो नाही," असं विधान संजय गायकवाड यांनी केले.

दहशतवाद ओळखायचा असेल तर उर्दू भाषा आली पाहिजे

"विषय फक्त हिंदीचा नाही. जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले. ते मुर्ख होते का? तसेच छत्रपती शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे," असंही संजय गायकवाड म्हणाले.

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे