शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

रात्री कुणी गेलं की काळजात होतं धस्स!

By admin | Updated: August 5, 2016 23:45 IST

कैलास स्मशानभूमीत भलताच पेच निर्माण केला असून, रात्री कुणी अकस्मात गेलं तर संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स होतंय.

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 5 -  कृष्णेच्या पुराने माहुलीच्या कैलास स्मशानभूमीत भलताच पेच निर्माण केला असून, रात्री कुणी अकस्मात गेलं तर संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स् होतंय. कारण सकाळ होईपर्यंत नातलगाचा मृतदेह घरातच ठेवण्याची पाळी या पुरानं आणलीय.महाबळेश्वर, वाई तालुक्यांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढत होत आहे. त्यामुळे माहुलीतील कैलास स्मशानभूमीत पाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याने रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर पर्याय म्हणून मृतदेह रात्रभर शीतपेटीत ठेवण्याचा पर्याय दिला आहे.कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे कैलास स्मशानभूमीचा काही भाग पाण्याखाली गेला होता. पाणी कमी झाले असले तरी पाणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यापुढे रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही त्या-त्या दिवसाच्या पाणी पातळीनुसार रात्री स्मशानभूमी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिली आहे. कैलास स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी १४ अग्निकुंड आहेत. त्यापैकी आठ नदीपात्रालगत तर सहा बंदिस्त आहेत. नदीला पाणी वाढल्याने आठही अग्निकुंड पाण्याखाली जातात. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे. रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मृतदेह ठेवण्यासाठी शहरात दोन ठिकाणी शव शीतपेटी भाडेतत्त्वावर उपलब्ध असल्याची माहिती मृताच्या नातेवाइकांना दिली जात आहे. रात्री चिता अर्धवटच जळाली.. अखेर सकाळी विधी दोन दिवसांपूर्वी माहुलीच्या स्मशानभूमीत रात्री दहा वाजता एका कुटुंबाने चिता पेटविली. आगीच्या ज्वाळा धडाडल्यानंतर नातेवाईक घरी गेले. मात्र, नंतरच्या तुफान पावसामुळे चिता अर्धवटच जळाली. तेव्हा, स्मशानभूमीतील संबंधित कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांशी मोबाइलवरुन संपर्क साधला. मात्र, अशा प्रचंड पावसात मध्यरात्री येणे शक्य नसल्याने नातेवाईक सकाळीच स्मशानभूमीत आले. पुन्हा एकदा सर्व विधी पार पाडून ही चिता पेटविण्यात आली. हा कटू अनुभव ध्यानात घेऊनच पूर ओसरेपर्यंत रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत अंत्यसंस्कार थांबवण्याचा निर्णय स्मशानभूमी व्यवस्थापनाने घेतलाय. गेल्या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत पावसामुळे रात्रीचे अंत्यसंस्कार स्थगित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.संततधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होत आहे. अंत्यविधी व्यवस्थित होण्यासाठी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत धोम आणि कऱ्हेर धरणांतील अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. पाण्याचा अंदाज घेऊन रात्री उपलब्ध अग्निकुंडात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. - राजेंद्र चोरगे, संस्थापक, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट