शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:09 IST

मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार काय काय करतंय, किती गांभीर्याने घेतंय हे समाज बघतोय.२४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागेल याची खात्री आहे. मराठे राजकारण्यांना फिरून दारालाही शिवू देणार नाहीत. कारण आमच्यासाठी लेकरांचे हित महत्त्वाचे आहे. आम्ही ज्या नेत्यांना मोठे केले ते जर आमच्याच विरोधात जायला लागले तर आम्हाला त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या लेकरांचे भविष्य आणि ते मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.२४ डिसेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे त्यांना लक्षात येईल. धोडा धीर धरा.तुम्ही का पलट्या मारताय? तुम्ही विषय का घेत नाही याकडे आमचेही लक्ष आहे. तुम्ही काय करताय, काय करणार आहे यावर बारकाईने नजर आहे. तुम्ही आम्हाला काय आश्वासनं दिलीत, गुन्हे, अटकेबाबत काय म्हटलं.मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनावर काय करताय यावर माझ्यासह मराठा समाजाचे लक्ष आहे.जरी माझा समाज गरीब असला आणि शेतात राबत असला तरी सरकार, आपण ज्याला निवडून दिले ते आपल्याबाबत अधिवेशनात काय भूमिका मांडतायेत हे बारकाईने पाहतोय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे पाहा असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल. एवढा पश्चाताप या लोकांना होईल की हा विषय आपण सोडवायला हवा होता. आता मात्र खेळ विचित्र झाला. काय समजायचे ते समजा, आम्हालाही काही मर्यादा आहेत. शेवटी आमचा संयम बघायला लागला तर आमचा नाईलाज आहे. आंदोलन शांततेत होणार, त्यावर मी आणि माझा समाज ठाम आहे.पण सरकारला पश्चाताप एवढा येणार की आजपर्यंत जीवनात कधीही आला नसेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, आज इंदापूरला छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होतेय त्यावर जरांगेंनी भुजबळांना सूचक सल्ला दिला आहे. सभा कुणीही घ्यावी. प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु जातीवाचक काही बोलू नये. तेढ निर्माण करू नये. घटनेच्या पदावर बसून कायदा आपण पायदळी तुडवायला नको याचे भान आपण ठेवले पाहिजे.वयाचाही विचार करून बोललं पाहिजे. शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्यांना शासन-प्रशासनाचा ४५ वर्षाचा अनुभव आहे.अशा माणसाने जातीय तेढ, दंगलीच्या भाषा करू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जर काही बोलले तर आम्ही बघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ