शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:09 IST

मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार काय काय करतंय, किती गांभीर्याने घेतंय हे समाज बघतोय.२४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागेल याची खात्री आहे. मराठे राजकारण्यांना फिरून दारालाही शिवू देणार नाहीत. कारण आमच्यासाठी लेकरांचे हित महत्त्वाचे आहे. आम्ही ज्या नेत्यांना मोठे केले ते जर आमच्याच विरोधात जायला लागले तर आम्हाला त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या लेकरांचे भविष्य आणि ते मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.२४ डिसेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे त्यांना लक्षात येईल. धोडा धीर धरा.तुम्ही का पलट्या मारताय? तुम्ही विषय का घेत नाही याकडे आमचेही लक्ष आहे. तुम्ही काय करताय, काय करणार आहे यावर बारकाईने नजर आहे. तुम्ही आम्हाला काय आश्वासनं दिलीत, गुन्हे, अटकेबाबत काय म्हटलं.मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनावर काय करताय यावर माझ्यासह मराठा समाजाचे लक्ष आहे.जरी माझा समाज गरीब असला आणि शेतात राबत असला तरी सरकार, आपण ज्याला निवडून दिले ते आपल्याबाबत अधिवेशनात काय भूमिका मांडतायेत हे बारकाईने पाहतोय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे पाहा असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल. एवढा पश्चाताप या लोकांना होईल की हा विषय आपण सोडवायला हवा होता. आता मात्र खेळ विचित्र झाला. काय समजायचे ते समजा, आम्हालाही काही मर्यादा आहेत. शेवटी आमचा संयम बघायला लागला तर आमचा नाईलाज आहे. आंदोलन शांततेत होणार, त्यावर मी आणि माझा समाज ठाम आहे.पण सरकारला पश्चाताप एवढा येणार की आजपर्यंत जीवनात कधीही आला नसेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, आज इंदापूरला छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होतेय त्यावर जरांगेंनी भुजबळांना सूचक सल्ला दिला आहे. सभा कुणीही घ्यावी. प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु जातीवाचक काही बोलू नये. तेढ निर्माण करू नये. घटनेच्या पदावर बसून कायदा आपण पायदळी तुडवायला नको याचे भान आपण ठेवले पाहिजे.वयाचाही विचार करून बोललं पाहिजे. शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्यांना शासन-प्रशासनाचा ४५ वर्षाचा अनुभव आहे.अशा माणसाने जातीय तेढ, दंगलीच्या भाषा करू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जर काही बोलले तर आम्ही बघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ