शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:09 IST

मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार काय काय करतंय, किती गांभीर्याने घेतंय हे समाज बघतोय.२४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागेल याची खात्री आहे. मराठे राजकारण्यांना फिरून दारालाही शिवू देणार नाहीत. कारण आमच्यासाठी लेकरांचे हित महत्त्वाचे आहे. आम्ही ज्या नेत्यांना मोठे केले ते जर आमच्याच विरोधात जायला लागले तर आम्हाला त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या लेकरांचे भविष्य आणि ते मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.२४ डिसेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे त्यांना लक्षात येईल. धोडा धीर धरा.तुम्ही का पलट्या मारताय? तुम्ही विषय का घेत नाही याकडे आमचेही लक्ष आहे. तुम्ही काय करताय, काय करणार आहे यावर बारकाईने नजर आहे. तुम्ही आम्हाला काय आश्वासनं दिलीत, गुन्हे, अटकेबाबत काय म्हटलं.मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनावर काय करताय यावर माझ्यासह मराठा समाजाचे लक्ष आहे.जरी माझा समाज गरीब असला आणि शेतात राबत असला तरी सरकार, आपण ज्याला निवडून दिले ते आपल्याबाबत अधिवेशनात काय भूमिका मांडतायेत हे बारकाईने पाहतोय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे पाहा असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल. एवढा पश्चाताप या लोकांना होईल की हा विषय आपण सोडवायला हवा होता. आता मात्र खेळ विचित्र झाला. काय समजायचे ते समजा, आम्हालाही काही मर्यादा आहेत. शेवटी आमचा संयम बघायला लागला तर आमचा नाईलाज आहे. आंदोलन शांततेत होणार, त्यावर मी आणि माझा समाज ठाम आहे.पण सरकारला पश्चाताप एवढा येणार की आजपर्यंत जीवनात कधीही आला नसेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, आज इंदापूरला छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होतेय त्यावर जरांगेंनी भुजबळांना सूचक सल्ला दिला आहे. सभा कुणीही घ्यावी. प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु जातीवाचक काही बोलू नये. तेढ निर्माण करू नये. घटनेच्या पदावर बसून कायदा आपण पायदळी तुडवायला नको याचे भान आपण ठेवले पाहिजे.वयाचाही विचार करून बोललं पाहिजे. शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्यांना शासन-प्रशासनाचा ४५ वर्षाचा अनुभव आहे.अशा माणसाने जातीय तेढ, दंगलीच्या भाषा करू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जर काही बोलले तर आम्ही बघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ