शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला नाही तर शिवसेनेलाही नको, रायगड जिल्हा भाजप मंत्र्याकडे द्या; NCP ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 09:00 IST

पालकमंत्रिपदावरून महायुतीत जुंपली, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली

दीपक भातुसे मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून रायगडचे पालकमंत्रिपद चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावरून महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. यावर तोडगा म्हणून रायगडचे पालकमंत्रिपद शिंदे गटालाही नको आणि राष्ट्रवादीलाही नको, तर भाजपने स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.  

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरेंनी हे पद भूषवले होते. मात्र या चर्चेमुळे शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावले यांची अस्वस्थता वाढली. त्यातूनच त्यांनी उघडपणे रायगडचे पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी केली आणि आदिती तटकरे महिला असल्याने त्यांच्यापेक्षा आपण चांगले काम करू शकू, असा अजब दावाही केला.  गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करण्यास अजित पवार गटाचा तीव्र विरोध असेल. राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद द्यायचे नसेल तर ते शिंदे गटालाही देऊ नये, त्याऐवजी भाजपने रायगडचे पालकमंत्रिपद घ्यावे, अशी मागणी पवार गटाने समोर ठेवल्याचे समजते.   

उदय सामंतांचे काय होणार?सध्या उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद आहे. अजित पवार गटाकडून होणारी मागणी मान्य झाली तर सामंत यांना रायगडचे पालकमंत्रिपद गमवावे लागेल. त्याऐवजी त्यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्याची जबाबदारी द्यावी लागेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा