शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:47 IST

Manoj Jarange Namdev Shastri Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांची भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पाठराखण केली आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आता मनोज जरांगे बोलले आहेत.

Manoj Jarange Namdev Shastri News: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर भूमिका मांडतांना महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली. भगवान गड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे नामदेव शास्त्री म्हणाले. त्यांच्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. "त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल. त्यांना दोष देता येणार नाही", अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे हे खंडणी घेणारे नेते नाहीत, असे म्हणत आपण त्यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे, असे नामदेव शास्त्री म्हणाले. 

मनोज जरांगे नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर काय बोलले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मी महंतांवर बोलू शकत नाही. ते कुणाला भीत नाहीत, पण त्यांना कुणी एकच बाजू सांगितली असेल; ते बोललेही असतील. एक संस्कारी पिढी घडवणारे समाज घडवणारे ते नामदेव शास्त्री आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल."

"मरण समोर दिसल्यावर..."

"खून, चोरी, छेडछाडी करणाऱ्यांबद्दल ते असं बोलतील असं वाटत नाही. त्यांना (नामदेव शास्त्री) दोष देता येणार नाही. कारण जो गेलाय, त्याला कुठे-कुठे हात पसरावे हेच कळेना. मरण पुढे दिसल्यानंतर असंच होते", अशी टीका धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

मुंडेंची टोळी समर्थन करतेय -जरांगे

"समाज कुठलाही असो, एवढी विकृत घटना कुणीही पाठीशी घालणार नाही. फक्त धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर इतर कुणीही समर्थन करणार नाही. वंजारी समाजाला या गोष्टी मान्य नाहीत. अशा लोकांना समाज पाठीशी घालणार नाही. महंत सुद्धा त्यांना पाठीशी घालणार नाही", असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.

वारकरी संप्रदाय बदनाम होत असल्याच्या नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे म्हणाले, "गुंड थोडी वारकरी संप्रदाय चालवतात. गुंडाचे सहकार्य घेऊन वारकरी संप्रदाय थोडी चालतो. मला शंका येतेय की, जे गेलेत त्यांनीच शिकवलं. कारण नामदेव शास्त्री असं बोलतील यावर विश्वास नाही", अशी भूमिका जरांगेंनी मांडली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliticsराजकारण