शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहिल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 21:29 IST

भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले. 

पुणे : भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले. 

यावेळी व्यासपीठावर खासदार कुमार केतकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले.ते म्हणाले की, 'राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घातला, लायसन्स राज मोडीत काढले. १९९१ चा कॉग्रेस पक्षाचा जाहीरनामा ही राजीव गांधी यांची मूळ संकल्पना होती. नरसिंहराव यांनी जो जाहीरनामा राबवला, त्याची मूळ संकल्पना राजीव गांधी यांची होती. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे जनक राजीव गांधी होते.सर्वात जास्त वार्षिक विकास दर १९८८ मध्ये १०.२ टक्के होता. मोदी सरकारने योजना आयोग बंद करून टाकला. त्याऐवजी नीती अयोग आणला. सर्वात यशस्वी पंचवार्षिक योजना गांधी यांनी राबवली.

कुमार केतकर म्हणाले की, राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाली तेव्हा संगणक केवळ ११ वर्षांचा होता, गुगलचा जन्मही झाला नव्हता. देशाला संगणकाची गरज नाही, त्यामुळे देशात बेरोजगारी येईल, अशी ओरड भाजपचे नेते करत होते. आता तेच नेते आपणच मोबाईल, संगणक क्रंती केली, असा अविर्भाव आणतात.

अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकास दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निर्यात बंद झाल्याने गुंतवणूक नाही, रोजगार नाही. मोदी सरकाच्या काळात केवळ योजनांचा कारखाना चालू आहे. जाहिरातबाजीमुळे सामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तरुणाई चुकीच्या दिशेने भरकटत आहे. नेमके काय चालले आहे, खरे काय, खोटे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे :

पृथ्वीराज चव्हाण :

आघाडी सरकारच्या काळात मिहान, भारत डायनमिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल अशा अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. फडणवीस सरकारच्या काळात केवळ मेक इन इंडियाची घोषणाबाजी केली. 

 मुद्रा योजनेत 7.28 कोटी लोकांना नोकर्या मिळाल्या - अमित शाह, नोकऱ्या आहेत, आकडेवारी नाही - मोदी, नोकऱ्या आहेत कुठे- गडकरी

2015 सालात सर्वाधिक  4291 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

निवडणुकीला सामोरे जाताना धार्मिक, जातीय ध्रुवीकरण होईल आघाडी होऊ नये यासाठी साम, दाम दंड भेद आणि पैशांचा अमाप वापर होईल 

कुमार केतकर :

मोदी हेच देशाला तारू शकतात, हा समज सर्वदूर पसरला आहे. पुन्हा मोदींची सत्ता आली तर २६ मे २०१४ किंवा ६ डिसेंम्बर १९९२ हे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित झाले तर आश्चर्य वाटायला नको.   

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण