शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहिल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 21:29 IST

भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले. 

पुणे : भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले. 

यावेळी व्यासपीठावर खासदार कुमार केतकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले.ते म्हणाले की, 'राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घातला, लायसन्स राज मोडीत काढले. १९९१ चा कॉग्रेस पक्षाचा जाहीरनामा ही राजीव गांधी यांची मूळ संकल्पना होती. नरसिंहराव यांनी जो जाहीरनामा राबवला, त्याची मूळ संकल्पना राजीव गांधी यांची होती. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे जनक राजीव गांधी होते.सर्वात जास्त वार्षिक विकास दर १९८८ मध्ये १०.२ टक्के होता. मोदी सरकारने योजना आयोग बंद करून टाकला. त्याऐवजी नीती अयोग आणला. सर्वात यशस्वी पंचवार्षिक योजना गांधी यांनी राबवली.

कुमार केतकर म्हणाले की, राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाली तेव्हा संगणक केवळ ११ वर्षांचा होता, गुगलचा जन्मही झाला नव्हता. देशाला संगणकाची गरज नाही, त्यामुळे देशात बेरोजगारी येईल, अशी ओरड भाजपचे नेते करत होते. आता तेच नेते आपणच मोबाईल, संगणक क्रंती केली, असा अविर्भाव आणतात.

अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकास दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निर्यात बंद झाल्याने गुंतवणूक नाही, रोजगार नाही. मोदी सरकाच्या काळात केवळ योजनांचा कारखाना चालू आहे. जाहिरातबाजीमुळे सामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तरुणाई चुकीच्या दिशेने भरकटत आहे. नेमके काय चालले आहे, खरे काय, खोटे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे :

पृथ्वीराज चव्हाण :

आघाडी सरकारच्या काळात मिहान, भारत डायनमिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल अशा अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. फडणवीस सरकारच्या काळात केवळ मेक इन इंडियाची घोषणाबाजी केली. 

 मुद्रा योजनेत 7.28 कोटी लोकांना नोकर्या मिळाल्या - अमित शाह, नोकऱ्या आहेत, आकडेवारी नाही - मोदी, नोकऱ्या आहेत कुठे- गडकरी

2015 सालात सर्वाधिक  4291 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

निवडणुकीला सामोरे जाताना धार्मिक, जातीय ध्रुवीकरण होईल आघाडी होऊ नये यासाठी साम, दाम दंड भेद आणि पैशांचा अमाप वापर होईल 

कुमार केतकर :

मोदी हेच देशाला तारू शकतात, हा समज सर्वदूर पसरला आहे. पुन्हा मोदींची सत्ता आली तर २६ मे २०१४ किंवा ६ डिसेंम्बर १९९२ हे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित झाले तर आश्चर्य वाटायला नको.   

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण