शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहिल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 21:29 IST

भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले. 

पुणे : भारतीय जनता पक्षाची सध्याची वाटचाल बघता ते पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहील का अशी शंका असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात मांडले. 

यावेळी व्यासपीठावर खासदार कुमार केतकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले.ते म्हणाले की, 'राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घातला, लायसन्स राज मोडीत काढले. १९९१ चा कॉग्रेस पक्षाचा जाहीरनामा ही राजीव गांधी यांची मूळ संकल्पना होती. नरसिंहराव यांनी जो जाहीरनामा राबवला, त्याची मूळ संकल्पना राजीव गांधी यांची होती. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे जनक राजीव गांधी होते.सर्वात जास्त वार्षिक विकास दर १९८८ मध्ये १०.२ टक्के होता. मोदी सरकारने योजना आयोग बंद करून टाकला. त्याऐवजी नीती अयोग आणला. सर्वात यशस्वी पंचवार्षिक योजना गांधी यांनी राबवली.

कुमार केतकर म्हणाले की, राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाली तेव्हा संगणक केवळ ११ वर्षांचा होता, गुगलचा जन्मही झाला नव्हता. देशाला संगणकाची गरज नाही, त्यामुळे देशात बेरोजगारी येईल, अशी ओरड भाजपचे नेते करत होते. आता तेच नेते आपणच मोबाईल, संगणक क्रंती केली, असा अविर्भाव आणतात.

अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकास दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. निर्यात बंद झाल्याने गुंतवणूक नाही, रोजगार नाही. मोदी सरकाच्या काळात केवळ योजनांचा कारखाना चालू आहे. जाहिरातबाजीमुळे सामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तरुणाई चुकीच्या दिशेने भरकटत आहे. नेमके काय चालले आहे, खरे काय, खोटे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे :

पृथ्वीराज चव्हाण :

आघाडी सरकारच्या काळात मिहान, भारत डायनमिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल अशा अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. फडणवीस सरकारच्या काळात केवळ मेक इन इंडियाची घोषणाबाजी केली. 

 मुद्रा योजनेत 7.28 कोटी लोकांना नोकर्या मिळाल्या - अमित शाह, नोकऱ्या आहेत, आकडेवारी नाही - मोदी, नोकऱ्या आहेत कुठे- गडकरी

2015 सालात सर्वाधिक  4291 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

निवडणुकीला सामोरे जाताना धार्मिक, जातीय ध्रुवीकरण होईल आघाडी होऊ नये यासाठी साम, दाम दंड भेद आणि पैशांचा अमाप वापर होईल 

कुमार केतकर :

मोदी हेच देशाला तारू शकतात, हा समज सर्वदूर पसरला आहे. पुन्हा मोदींची सत्ता आली तर २६ मे २०१४ किंवा ६ डिसेंम्बर १९९२ हे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित झाले तर आश्चर्य वाटायला नको.   

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण