शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

Sharad Pawar: आघाडी सरकार टिकवायचं असेल तर...; शरद पवारांनी स्पष्ट शब्दातच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 07:59 IST

अजित पवार यांच्याबद्दल आता त्यांनी काही गोष्टी केल्या असतील. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील लोक भाजपला पुन्हा धडा शिकवतील.

सोलापूर : आघाडीचे सरकार टिकवायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वांनी साथ द्यावी. आगामी सर्वच निवडणुका या एकत्र लढण्याचा विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी हातात हात घालून सर्वांनी काम करावे. ऊस उत्पादकांना बिल देण्यासाठी जुनी पद्धत योग्यच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या छाप्यांवरून पवारांनी सोलापुरात केंद्र सरकारवर टीका केली.

लोक भाजपला पुन्हा धडा शिकवतील 

पवार म्हणाले, मला काही लोकांनी चिठ्ठ्या पाठविल्या की, अजित पवार यांच्याकडे सरकारने काही पाहुणे पाठविले हाेते. आपल्याला पाहुण्यांची चिंता नसते. विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीने मला एका बँकेच्या प्रकरणात नोटीस पाठविली होती. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली. महाराष्ट्रातील लोकांनी भाजपला येडे ठरविले. अजित पवार यांच्याबद्दल आता त्यांनी काही गोष्टी केल्या असतील. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील लोक भाजपला पुन्हा धडा शिकवतील.

हाच आमचा मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा उचलला हात!

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापनेवेळी निर्माण झालेल्या स्थितीची आठवण शरद पवार यांनी सांगितली. १०६ आमदारांवर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला अन्‌ आमच्या ५४ आमदारांची पळापळ सुरू होती. काँग्रेस, सेनेसोबत बैठक घेतली. सर्वजण थंड डोक्याने बसलेले असतानाच शेजारी बसलेले उद्धव ठाकरे यांचे हात उंचावून हाच आमचा मुख्यमंत्री असे म्हणताच महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. कुठे गेल्यावर कामे होतात हे कार्यकर्त्यांना माहिती झाले आहे. हे सरकार आपल्याला टिकवायचं आहे.

बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावेउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या. त्यात ८ लोक मारले गेले. या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. भाजपविरुद्धच्या या बंदमध्ये सर्वपक्षियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस