शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:30 IST

सर्वोच्च न्यायालय शिंदे गटला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळ देऊ शकते का? सत्तासंघर्षावरील तुमच्या आमच्या मनाला सतावणारे अनेक प्रश्न, त्यांची उल्हास बापट यांनी दिलेली उत्तरे...

१६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे गट-भाजपाच्या सरकारला धोका नाही असे शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील सांगत आहेत. परंतू घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांच्या मते निकाल काय असेल, हे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी 16 आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे राज्यात काय होईल याचेही भाकीत केले आहे. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत घेतली. यावेळी बापट यांनी काही शक्यता वर्तविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे. 

समजा न्यायालयाने पक्षांतर बंदी कायदा लागू होतोय, परंतू तुमच्याकडे ४० आमदार आहेत मग एक ठराविक कालावधी देऊन तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सर्वोच्च न्यायालय म्हणू शकते का, या सवालावर याला डॉक्टीन ऑफ सायलेन्सेस असे आम्ही म्हणतो. १० व्या कलमानुसार तुम्ही पक्षाच्या विरोधात मतदान करणार असाल तर आधी पक्षाची परवानगी काढा किंवा पुढच्या १५ दिवसांत पक्षाने तुम्हाला माफ करायला हवे. इथे आता १० महिने झाले आहेत. यामुळे असा अर्थ घटनेचा लावता येणार नाही, असे बापट म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आता तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सांगण्याची सुतराम शक्यता नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

सर्वोच्च न्यायालय तुमच्या मते काय निकाल देईल, असा सवाल विचारला असता बापट यांनी गेल्या १० वर्षांपासून मी जे अंदाज व्यक्त केले ते बरोबर आले आहेत. ईडब्लूएसचा एक अपवाद वगळता सर्व माझे निष्कर्ष बरोबर ठरले आहेत. दोन तृतियांश  लोक बाहेर पडले तर ते एकाचवेळी बाहेर पडायला हवे. १६ जे बाहेर पडले ते दोन तृतियांश होत नाहीत. घटनेशी विसंगत गोष्ट, यामुळे घटनेमुळे ते अपात्र ठरायला हवेत. शिंदे राजीनामा देणार, म्हणजे हे सरकार पडणार. माझ्यामते कोणालाही बहुमत मिळत नाहीय. नार्वेकर इंग्लंडवरून काय शोध लावून येतील माहिती नाही. परंतू राज्यात राष्ट्रपती राजवट येईल, सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. महाराष्ट्राची जनता ठरवेल ठाकरे बरोबर की शिंदे की फडणवीस. अंतिम अधिकार जनतेकडे असेल, असे बापट म्हणाले. 

आताच्या ज्या पाच जणांच्या बेंचने दिलेला निर्णय हा महाराष्ट्रापुरताच लागू होणार आहे. रेबियासह आतापर्यंत तीन खटले झालेत. सातचे बेंच नेमून याचा निर्णय करता येईल, यामुळे कायदा भारतभर लागू होईल. परंतू ते पुढचे पाऊल झाले. हा खटला पुढे सात जणांकडे नेणे चुकीचे ठरेल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना