शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:30 IST

सर्वोच्च न्यायालय शिंदे गटला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळ देऊ शकते का? सत्तासंघर्षावरील तुमच्या आमच्या मनाला सतावणारे अनेक प्रश्न, त्यांची उल्हास बापट यांनी दिलेली उत्तरे...

१६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे गट-भाजपाच्या सरकारला धोका नाही असे शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील सांगत आहेत. परंतू घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांच्या मते निकाल काय असेल, हे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी 16 आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे राज्यात काय होईल याचेही भाकीत केले आहे. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत घेतली. यावेळी बापट यांनी काही शक्यता वर्तविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे. 

समजा न्यायालयाने पक्षांतर बंदी कायदा लागू होतोय, परंतू तुमच्याकडे ४० आमदार आहेत मग एक ठराविक कालावधी देऊन तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सर्वोच्च न्यायालय म्हणू शकते का, या सवालावर याला डॉक्टीन ऑफ सायलेन्सेस असे आम्ही म्हणतो. १० व्या कलमानुसार तुम्ही पक्षाच्या विरोधात मतदान करणार असाल तर आधी पक्षाची परवानगी काढा किंवा पुढच्या १५ दिवसांत पक्षाने तुम्हाला माफ करायला हवे. इथे आता १० महिने झाले आहेत. यामुळे असा अर्थ घटनेचा लावता येणार नाही, असे बापट म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आता तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सांगण्याची सुतराम शक्यता नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

सर्वोच्च न्यायालय तुमच्या मते काय निकाल देईल, असा सवाल विचारला असता बापट यांनी गेल्या १० वर्षांपासून मी जे अंदाज व्यक्त केले ते बरोबर आले आहेत. ईडब्लूएसचा एक अपवाद वगळता सर्व माझे निष्कर्ष बरोबर ठरले आहेत. दोन तृतियांश  लोक बाहेर पडले तर ते एकाचवेळी बाहेर पडायला हवे. १६ जे बाहेर पडले ते दोन तृतियांश होत नाहीत. घटनेशी विसंगत गोष्ट, यामुळे घटनेमुळे ते अपात्र ठरायला हवेत. शिंदे राजीनामा देणार, म्हणजे हे सरकार पडणार. माझ्यामते कोणालाही बहुमत मिळत नाहीय. नार्वेकर इंग्लंडवरून काय शोध लावून येतील माहिती नाही. परंतू राज्यात राष्ट्रपती राजवट येईल, सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. महाराष्ट्राची जनता ठरवेल ठाकरे बरोबर की शिंदे की फडणवीस. अंतिम अधिकार जनतेकडे असेल, असे बापट म्हणाले. 

आताच्या ज्या पाच जणांच्या बेंचने दिलेला निर्णय हा महाराष्ट्रापुरताच लागू होणार आहे. रेबियासह आतापर्यंत तीन खटले झालेत. सातचे बेंच नेमून याचा निर्णय करता येईल, यामुळे कायदा भारतभर लागू होईल. परंतू ते पुढचे पाऊल झाले. हा खटला पुढे सात जणांकडे नेणे चुकीचे ठरेल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना