शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

...तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, धर्मा पाटलांच्या पुत्राचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:16 IST

खासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.

मुंबई- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. जर सरकारने योग्य मदत दिली नाही तर बापाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिलाय.दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राचं धोरण मूठभर धनदांडग्यांच्या गल्ला भरणारे आणि शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे.  हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्‍यांची फसवणूक करते आहे. धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तो मंत्री असल्याने तात्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटील सारख्या कोणताही वशिला अन् राजाश्रय नसलेल्या शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, ही परिस्थिती या सरकारने आज राज्यात निर्माण केली आहे.

धर्मा पाटील यांना सरकारने अत्यल्प मोबदला देण्यासंदर्भात विखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांंची कमी पैशात बोळवण करण्याचा प्रयत्न करते आहे. सरकारी दलालांमार्फत येणार्‍या शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळते. पण दलालाच्या तुंबड्या न भरणाऱ्या शेतकर्‍यांवर जीव देण्याची वेळ येते, यातून हे सरकार नेमका काय संदेश देते आहे? आता धर्मा पाटलांनी विष घेतल्यावर सरकार अनुदान देण्याच्या घोषणा करते. मग हे शहाणपण आधीच का नाही सूचले? शेतकर्‍यांना सरकारी अनुदानाची भीक नको, आपल्या जमिनीची योग्य किंमत हवी आहे. धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकर्‍याला न्याय का नाकारला गेला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.

राजू शेट्टींनी घेतली धर्मा पाटलांची भेटखासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे, असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.धर्मा पाटील यांना 200 गुंठे बागायती शेतीसाठी 4 लाख रुपये नुकसानभरपाई सरकारनं देऊ केली. मात्र दुसरीकडे त्याच गटातील 74 गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला 1 कोटी 89 लाख रुपये भरपाई मिळते आहे, सरकार असा दुजाभाव का करतंय. ऊर्जामंत्री बावनकुळेंनी हा कोणता नवा जावईशोध लावलाय, असा सवाल उपस्थित करत खासदार राजू शेट्टी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने देऊ केलेली 15 लाखांची मदत नाकारली आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRaju Shettyराजू शेट्टीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील