शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मी मोकळाच होतो, दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जबरदस्त टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:05 IST

आता बोललो तेवढे पुरे झाले, उरलेले आपण नंतर एकत्र बसून बोलू, हे सरकार बहुमताचे सरकार आहे. मंत्री झालो तरी कार्यकर्ताच राहणार, असे शिंदे म्हणाले.

अजित पवार, फडणवीस यांची भाषणे झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले. त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारमध्ये शिवसेनेची कशी कोण गळचेपी करत होते, यावर एवढी टोलेबाजी केली की फडणवीसांसह भाजपा-शिवसेनेचे आमदार पोट धरून हसत होते, तर समोरील बाकावरील पवार, जयंत पाटील यांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते. 

यावेळी शिंदेंनी भाजपा, शिवसेनेच्या आमदारांचा मी मुख्यमंत्री नाहीय, तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मुख्यमंत्री आहे. एवढेच नाही तर अजितदादा देखील आमचेच आहेत. मी माड्या बांधल्या नाही, हॉटेल बांधली नाहीत. आहेत का हो आव्हाड साहेब, अशा शब्दांच शिंदे यांनी राष्ट्रवादीला कोपरखळी मारली. मी नगरविकास मंत्री होतो, तेव्हा मी आमदारांना खूप पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होते. कारण काही जण वॉच ठेवून होते, भाजपाच्या आमदाराला जास्त पैसे तर देत नाहीय ना, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाला लगावला. 

मोदींनी मला सांगितले, एकनाथजी चांगले काम करा, राज्याला प्रगतीपथावर न्या. नड्डांचे देखील आभार मानतो. त्याहून मोठा कलाकार माझ्या शेजारी बसलाय. आम्ही कधी भेटायचो हे कोणाला कळायचे पण नाही. रात्री आमचे लोक झोपले की मी त्यांना भेटायचो आणि सकाळी जागे व्हायच्या आधी परत यायचो, असे शिंदे म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी डोक्यावर हात मारून घेतला. 

अजित पवार आणि जयंत पवारांवर बोलताना शिंदे यांनी म्हणाले की दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते. जयंत पाटील तर आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच. यामुळे आमचे आमदार चलबिचल झाले. ते मला येऊन भेटायचे. मी मोकळाच होतो, यामुळे मी त्यांचे ऐकून घ्यायचो. चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून बाहेरच होते. जिल्ह्यात जात नव्हते. एका पदाधिकाऱ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या घरच्यांकडे गेले, त्याला राष्ट्रवादीत ये एक सुनावणी लावू आणि सगळे गुन्हे रद्द करू, हे जयंत पाटांलाना माहितीय असे मी म्हणत नाही, असेही शिंदे म्हणाले. 

आता बोललो तेवढे पुरे झाले, उरलेले आपण नंतर एकत्र बसून बोलू, हे सरकार बहुमताचे सरकार आहे. मंत्री झालो तरी कार्यकर्ताच राहणार. त्यामुळे विरोधकांनी देखील दुजाभाव करू नये. मोदींच्या मदतीने आपण राज्याचा विकास करू, असे शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा