शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:34 IST

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही शास्त्रींच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. 

Namdev Shastri Jitendra Awhad: "या गादीने द्वेष सोडून याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडून अशा कृत्याबद्दल भाष्य करणे मला पटलेलं नाही", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्या झालेल्या वंजारी समाजातील व्यक्तींची यादी वाचत आव्हाडांनी यांना न्याय मिळणार आहे का?, असा सवाल नामदेव शास्त्रींना केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी नामदेव शास्त्रींना उलट सवाल केला. 

नामदेव शास्त्रींच्या विधानावर आव्हाड काय बोलले?

"नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी, हे सांगण्या इतका काही मी मोठा नाही. पण, ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की, आधी तिथे मारहाण झाली. मग जे काय... हे बोलणं योग्य नाही", अशा शब्दात आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. 

आव्हाडांनी हत्या, जीवघेणे हल्ले झालेल्यांची वाचली यादी

"भगवान गडाच्या गादीची एक परंपरा आहे. या गादीचे मठाधिपती होते, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते. आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो, गेल्या काही वर्षामध्ये खून झाले त्यांची नावे ऐका. संगीत दिघोळे वंजारी, काकासाहेब गर्जे वंजारी, महादेव मुंडे वंजारी, बापू आंधळे वंजारी, बंडू मुंडे वंजारी... ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. महादेव गीते वंजारी, सहदेव सातभाई वंजारी, राजाभाऊ नेहरकर वंजारी... खूनात अडकवून ज्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला गेला, शिवराज बांगर, बबनभाऊ गीते वंजारी, रामकृष्ण बांगर-विजय सिंह बांगर वंजारी, प्रकाश मुंडे वंजारी, राजाभाऊ फड वंजारी... यांना न्याय मिळणार आहे का?", असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री यांना केला. 

मला ते पटलेलं नाही -जितेंद्र आव्हाड

"आपण कसलं समर्थक करतोय? खून कोणी केलाय, मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही. पण, ते निर्दोष आहेत का, नाही. या गँगला पोसण्याचं, मोठं करण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलंय ना. या गादीने द्वेष सोडून याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडून अशा कृत्याबद्दल भाष्य करणे मला पटलेलं नाही", असे म्हणत आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. 

"ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत. पण, आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असे माझे मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे", असेही आव्हाड म्हणाले.  

धनंजय मुंडेंची भूमिका

दरम्यान, नामदेश शास्त्रींची भेट घेतल्यानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणालेले की, "भूमिका स्वतःहून मांडल्यानंतर काही जण राजकारण करत असतील, तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे की, स्व. संतोष देशमुखला खऱ्या अर्थाने न्याय देऊन, ज्यांनी कुणी अशी निर्घृण हत्या केली, त्यांना फासावर लटकावणं महत्त्वाचं आहे. माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. माझं सरळ म्हणणं आहे की, यात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकावलं पाहिजे", असे धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्रींच्या भेटीनंतर म्हटलेले आहे."

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेwalmik karadवाल्मीक कराड