शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
5
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
6
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
7
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
8
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
9
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
10
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
11
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
12
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
13
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
14
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
15
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
16
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
17
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
18
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
19
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
20
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
Daily Top 2Weekly Top 5

"दोन पक्ष फोडून आलो"; देवेंद्र फडणवीस म्हणतात, "हे वाक्य मी एकदाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:44 IST

देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं.

Devendra Fadnavis : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून राज्यात बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर पाच वर्षाच्या काळात दोनवेळा सत्तांतर झालं. या सगळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच चर्चेत राहिले होते. २०१९ साली सर्वात जास्त जागा मिळवून देखील सत्ता स्थापन करता आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.

मार्च महिन्यात एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन या वाक्याबाबत भाष्य केलं होतं. मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण उद्धव ठाकरेंनी   स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे होत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण हे गमतीने बोललो असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपने सुरुवातीला दोन्ही पक्ष फुटले त्याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो असं विधान केले होते. या विधानाचा लोकसभेत फटका बसला का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"मी ते एकदाच बोललो आणि  गंमतीत बोललो. पण इको सिस्टमने पकडलं आणि तेच चालवलं. पण ठीक आहे ते त्यांचं काम आहे. पण आम्ही हे सातत्याने सांगितलं की, कोणी कोणाचा पक्ष फोडू शकत नाही. त्या-त्या पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे आणि पवार साहेबांकडे ज्या वेळेस शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षात आमचं कोणतंही भविष्य नाही. कारण इकडे आदित्य ठाकरेंना भविष्य आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंना भविष्य आहे. त्यांची कुचंबणा व्हायला लागली होती. ज्या गोष्टींसाठी पक्षात आहोत किंवा जी विचारसरणी आपण सांगतो त्याच्या विरोधात आपण करत आहोत. अशा अनेक गोष्टी घडल्या यामुळे ते पक्ष फुटले," असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार