शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

"दोन पक्ष फोडून आलो"; देवेंद्र फडणवीस म्हणतात, "हे वाक्य मी एकदाच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:44 IST

देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं.

Devendra Fadnavis : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून राज्यात बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर पाच वर्षाच्या काळात दोनवेळा सत्तांतर झालं. या सगळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच चर्चेत राहिले होते. २०१९ साली सर्वात जास्त जागा मिळवून देखील सत्ता स्थापन करता आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.

मार्च महिन्यात एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन या वाक्याबाबत भाष्य केलं होतं. मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण उद्धव ठाकरेंनी   स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे होत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण हे गमतीने बोललो असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपने सुरुवातीला दोन्ही पक्ष फुटले त्याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो असं विधान केले होते. या विधानाचा लोकसभेत फटका बसला का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"मी ते एकदाच बोललो आणि  गंमतीत बोललो. पण इको सिस्टमने पकडलं आणि तेच चालवलं. पण ठीक आहे ते त्यांचं काम आहे. पण आम्ही हे सातत्याने सांगितलं की, कोणी कोणाचा पक्ष फोडू शकत नाही. त्या-त्या पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे आणि पवार साहेबांकडे ज्या वेळेस शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षात आमचं कोणतंही भविष्य नाही. कारण इकडे आदित्य ठाकरेंना भविष्य आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंना भविष्य आहे. त्यांची कुचंबणा व्हायला लागली होती. ज्या गोष्टींसाठी पक्षात आहोत किंवा जी विचारसरणी आपण सांगतो त्याच्या विरोधात आपण करत आहोत. अशा अनेक गोष्टी घडल्या यामुळे ते पक्ष फुटले," असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार