शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

Ajit Pawar : "राज्यातलं बदललेलं राजकीय वातावरण मला पसंत नाही," अजित पवारांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 09:39 IST

सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar : सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी रायगडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं. "सध्या जे काही सुरू आहे ते मला अजिबात पसंत नाही. ही आपली महाराष्ट्राची पद्धत नाही," असं ते म्हणाले.

"महाराष्ट्राची निर्मिती होऊन साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या काळात कशी पद्धत होती. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात आम्ही आठ वर्ष काम केलं. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षाचे नेते आणि विलासराव देशमुख सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांच्या भाषणात एकमेकांना चिमटे काढले जात होते, परंतु खालच्या पातळीवर राजकारण कधीही झालं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचीही एकमेकांवर टीकाटिपण्णी व्हायची. परंतु त्यांचे मित्रत्वाचे संबंध अखेरपर्यंत राहिल्याचं आपण पाहिलं. तसं मात्र आताच्या काळात होताना दिसत नाही. हे दुर्देव आहे. जे चुकीचं बोलतायत अशा सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यात सुधारणा केली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले."वादंगाची बातमी मध्यतरी एका वृत्तपत्रात आली होती. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. एका पक्षातही वाद असू शकतात. तीन पक्ष आणि अन्य छोटे पक्ष एकत्र येतात. अशात भांड्याला भांड लागल्यावर थोडा आवाज येतोच. परंतु कोणीही काही काळजी करण्याचं कारण नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो हे अनेकदा महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे. आम्हीही महाविकास आघाडीतील प्रमुख लोक ते दाखवून देऊ," असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण