शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:43 IST

Prithviraj Chavan News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. मात्र या टीकेनंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पूर्णपणे पराभव झाला होता. आपली विमानं पाडली गेली. भारताचे हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होते. त्यावरून चव्हाण यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र या टीकेनंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानामुळे उदभवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी माझ्या वक्तव्यात काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. घटनेने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी लष्कराने आणि भारत सरकारने केलेले दावे खोडून काढणारं विधान केलं होतं. "ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी आमचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आम्ही हरलो. लोक मान्य करा किंवा न करा, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते, तर पाकिस्तानने ते पाडले असते अशी दाट शक्यता होती. यामुळे, हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते’’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

याबरोबरच भारताच्या सैन्यदलात कपात करण्याची आवश्यकता असल्याचं विधानही चव्हाण यांनी केलं होतं. ‘’आता तुमच्याकडे कितीही पायदळ असले तरी काही फरक पडत नाही, कारण कोणीही तुम्हाला अशा प्रकारचे युद्ध लढू देणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे गेले नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, लढाई केवळ हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपुरती मर्यादित होती आणि भविष्यातील युद्धेही त्याच प्रकारे सुरू राहतील. अशा परिस्थितीत, १२ लाख सैनिकांची सेना राखण्याची काय गरज आहे? त्यांचा वापर दुसऱ्या कशासाठी तरी करणे चांगले होईल’’, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chavan Stands Firm: No Apology for Operation Sindoor Statement

Web Summary : Ex-CM Prithviraj Chavan refuses to apologize for his controversial Operation Sindoor statement, claiming India suffered defeat. He stands by his remarks, asserting his right to question the event and military spending.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दल