शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:43 IST

Prithviraj Chavan News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. मात्र या टीकेनंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद उफाळून आला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पूर्णपणे पराभव झाला होता. आपली विमानं पाडली गेली. भारताचे हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होते. त्यावरून चव्हाण यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र या टीकेनंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानामुळे उदभवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी माझ्या वक्तव्यात काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. घटनेने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी लष्कराने आणि भारत सरकारने केलेले दावे खोडून काढणारं विधान केलं होतं. "ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी आमचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आम्ही हरलो. लोक मान्य करा किंवा न करा, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते आणि एकही विमान उडाले नाही. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते, तर पाकिस्तानने ते पाडले असते अशी दाट शक्यता होती. यामुळे, हवाई दल पूर्णपणे जमिनीवर होते’’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

याबरोबरच भारताच्या सैन्यदलात कपात करण्याची आवश्यकता असल्याचं विधानही चव्हाण यांनी केलं होतं. ‘’आता तुमच्याकडे कितीही पायदळ असले तरी काही फरक पडत नाही, कारण कोणीही तुम्हाला अशा प्रकारचे युद्ध लढू देणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे गेले नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, लढाई केवळ हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपुरती मर्यादित होती आणि भविष्यातील युद्धेही त्याच प्रकारे सुरू राहतील. अशा परिस्थितीत, १२ लाख सैनिकांची सेना राखण्याची काय गरज आहे? त्यांचा वापर दुसऱ्या कशासाठी तरी करणे चांगले होईल’’, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chavan Stands Firm: No Apology for Operation Sindoor Statement

Web Summary : Ex-CM Prithviraj Chavan refuses to apologize for his controversial Operation Sindoor statement, claiming India suffered defeat. He stands by his remarks, asserting his right to question the event and military spending.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दल