शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

Ajit Pawar मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही; अजित पवारांनी इतिहास सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:04 IST

I did not play politics of casteism and kinship; Ajit Pawar narrated the history २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता असं अजित पवार म्हणाले.

मुंबई  - मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. मी त्यात अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सकाळी लवकर कामाला सुरूवात करतो. देशाचे पहिल्या नंबरचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करताना साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलोय, तयार झालोय यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येकाचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या २५ व्या वर्षापासून ७५ पर्यंत उत्तमरितीने काम करू शकतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले की, साहेबच आमचे दैवत आहेत. आज देश आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. राजकीय पक्ष लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी स्थापन करतोय. संविधानाचा, देशहितासाठी, सर्व समाजातील घटकांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करतोय. पक्ष वाढला पाहिजे, खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे हे चक्र असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पूलोद सरकारमध्ये जनसंघ होता, जो आता भाजपा आहे. १९८० मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. इतिहास पाहिला तर कुणी ना कुणी करिश्मा असणारे नेतृत्व लागते. लोकशाही आहे हे घडले आहे. जयप्रकाश नारायण यांचे ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिले. करिश्मा असणारा नेता नसल्याने जनता पक्ष आता कुठेही नाही.

उत्साह, जोश, समाजासाठी काम करण्याची जिद्द असते. परंतु हे घडताना आम्हाला, जनतेला सांगितले की, १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये सामील झाली. त्यानंतर १९८८ मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रिपद दिले. ९१ ला राजकारण बदलले. मला बारामतीकरांनी खासदार केले. त्यावेळी राजीव गांधी आपल्यातून निघून गेले. एक लाट आली पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले. शरद पवार संरक्षणमंत्री झाले. ९५ मध्ये आपले सरकार गेले. भाजपा-शिवसेना युती सरकार आले. तो काळही आपण पाहिला.

१९९९ मध्ये सोनिया गांधी परदेशी आहेत हे आम्हाला सांगितले. परदेशी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही असं म्हटलं आपण ऐकले. १९९९ साली सगळ्यांनी पुढाकार घेतला राष्ट्रवादीची स्थापना झाली. ६ महिन्यात निवडणुका लागल्या. तेव्हा शिवाजी पार्क संपूर्ण मैदान गाजवण्याचे काम भुजबळांनी केले. नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी काही तरी केले पाहिजे. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवला पाहिजे असं आम्हाला वाटले. पहिल्या टर्ममध्ये आम्हाला मंत्रिपदे दिली

राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा आल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपद पक्षाला देण्याची तयारी केली. पण ४ मंत्रिपदे जास्त घेऊन आलेली संधी गमावली. २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता. आम्ही लोकांमध्ये मिसळलो, वडिलधाऱ्यांचा आदर केला. आमदारांनी काम करावे. विकास करावा. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावे.

वैयक्तिक कुणाच्या स्वार्थासाठी हा निर्णय पक्षाने घेतला नाही. पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात अनेक विकासकामे रखडली आहे. काही कामांना स्थगिती मिळाली आहे ती उठवायची आहे. मी भेदभाव करत नाही. भाजपा, शिवसेना आमदारांनाही सांगतो. माझी प्रतिमा दबंग नेता आहे पण मी तसा नाही. मी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जाईन.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस