शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Ajit Pawar मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही; अजित पवारांनी इतिहास सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:04 IST

I did not play politics of casteism and kinship; Ajit Pawar narrated the history २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता असं अजित पवार म्हणाले.

मुंबई  - मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. मी त्यात अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सकाळी लवकर कामाला सुरूवात करतो. देशाचे पहिल्या नंबरचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करताना साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलोय, तयार झालोय यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येकाचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या २५ व्या वर्षापासून ७५ पर्यंत उत्तमरितीने काम करू शकतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले की, साहेबच आमचे दैवत आहेत. आज देश आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. राजकीय पक्ष लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी स्थापन करतोय. संविधानाचा, देशहितासाठी, सर्व समाजातील घटकांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करतोय. पक्ष वाढला पाहिजे, खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे हे चक्र असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पूलोद सरकारमध्ये जनसंघ होता, जो आता भाजपा आहे. १९८० मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. इतिहास पाहिला तर कुणी ना कुणी करिश्मा असणारे नेतृत्व लागते. लोकशाही आहे हे घडले आहे. जयप्रकाश नारायण यांचे ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिले. करिश्मा असणारा नेता नसल्याने जनता पक्ष आता कुठेही नाही.

उत्साह, जोश, समाजासाठी काम करण्याची जिद्द असते. परंतु हे घडताना आम्हाला, जनतेला सांगितले की, १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये सामील झाली. त्यानंतर १९८८ मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रिपद दिले. ९१ ला राजकारण बदलले. मला बारामतीकरांनी खासदार केले. त्यावेळी राजीव गांधी आपल्यातून निघून गेले. एक लाट आली पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले. शरद पवार संरक्षणमंत्री झाले. ९५ मध्ये आपले सरकार गेले. भाजपा-शिवसेना युती सरकार आले. तो काळही आपण पाहिला.

१९९९ मध्ये सोनिया गांधी परदेशी आहेत हे आम्हाला सांगितले. परदेशी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही असं म्हटलं आपण ऐकले. १९९९ साली सगळ्यांनी पुढाकार घेतला राष्ट्रवादीची स्थापना झाली. ६ महिन्यात निवडणुका लागल्या. तेव्हा शिवाजी पार्क संपूर्ण मैदान गाजवण्याचे काम भुजबळांनी केले. नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी काही तरी केले पाहिजे. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवला पाहिजे असं आम्हाला वाटले. पहिल्या टर्ममध्ये आम्हाला मंत्रिपदे दिली

राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा आल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपद पक्षाला देण्याची तयारी केली. पण ४ मंत्रिपदे जास्त घेऊन आलेली संधी गमावली. २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता. आम्ही लोकांमध्ये मिसळलो, वडिलधाऱ्यांचा आदर केला. आमदारांनी काम करावे. विकास करावा. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावे.

वैयक्तिक कुणाच्या स्वार्थासाठी हा निर्णय पक्षाने घेतला नाही. पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात अनेक विकासकामे रखडली आहे. काही कामांना स्थगिती मिळाली आहे ती उठवायची आहे. मी भेदभाव करत नाही. भाजपा, शिवसेना आमदारांनाही सांगतो. माझी प्रतिमा दबंग नेता आहे पण मी तसा नाही. मी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जाईन.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस