शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

"बाबा, मी या वयात इतका फिरतोय, तू ही किमान बाहेर पड! हीच शरद पवारांची मुख्यमंत्र्यांप्रती भावना असणार.." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 15:53 IST

सरकार चालवण्यासाठीच शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे..

पुणे : शरद पवार हे विरोधी पक्षाचे असले तरी त्यांच्या विषयी मला नितांत आदर आहे. अनेक गोष्टींना त्यांनी न्याय दिला आला आहे. अशा नेत्याला मुख्यमंत्र्यांची वारंवार भलामण करावी लागते याचं वाईट वाटत आहे. महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे. त्यांना वेळोवेळी प्रोटेक्ट करावे लागते. परंतु, पवार ते मनापासून करत असतील असे मला वाटत नाही. बाबा, मी या वयात इतका फिरतोय, तू ही किमान बाहेर पड असेच मुख्यमंत्र्यांप्रती शरद पवारांना वाटत असणार आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त 'एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फौंडेशन' यांच्यावतीने 'आत्मनिर्भर भारत अभियाना' अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना विविध वस्तू भेट वाटप कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावत प्रवास करून पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौऱ्यावरही देखील टीकास्र सोडले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी धावपळीत केलेला नुकसानग्रस्त भागाचा दौरा उपयोगाचा नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. झटपट निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा त्यासाठी पंचनामे करत बसण्याची गरज नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर टीका केली.

पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करण्यात काय अर्थ आहे. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करणे गरजेचे आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागायची असते. त्यामुळे राज्य सरकारने या कालावधीत नुकसानग्रस्तांना मदत देणे आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर या मदतीची घोषणा राज्य सरकारने करावी.त्यानंतर केंद्र सरकारकडून जी काही मदत जाहीर होईल ती बोनस म्हणून समजावे.. . ...... एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चंद्रकांत पाटलांची 'ही' मोठी प्रतिक्रिया....  गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काहीजणांकडून तर त्यांच्या पक्षप्रवेश निश्चित केला गेला असून मुहूर्त देखील जाहीर करण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही अनेक दिवसांपासून खडसे यांनी शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेते मंडळींच्या भेटीगाठी आहे. पण याही परिस्थितीत भाजपच्या नेत्यांना एकनाथ खडसे हे पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वास आहे. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे. 

भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

एकनाथ खडसे यांच्या भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या चर्चेवर पाटील यांनी भाष्य केले. पाटील म्हणाले, भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. तसेच खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण