शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

चंद्रकांत पाटलांना मी हिमालयात सोडायला जातो, जयंत पाटील यांचा उपराेधिक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 07:01 IST

येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे.

सातारा : भाजपचे नेते बोलतात तसे वागत नाहीत. चंद्रकांतदादा तर भाजपचे सोयीचे अध्यक्ष वाटतात. कोल्हापुरातील निवडणुकीवरून हिमालयात जाणार, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे हिमालयात ते जाणार असतील तर इथंही उकाडा आहे. त्यामुळे त्यांना सोडायला मी जातो, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर त्यांनी नकलाकाराकडून काय अपेक्षा करणार, असा प्रहारही केला.येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे. २३ एप्रिलला कोल्हापुरात या यात्रेचा समारोप होत आहे. राज्यात या यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरीही यामधून बरीच सुधारणा करावी लागेल, असेही दिसून आले आहे.राज्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आरोप आणि अल्टिमेटम देणे सुरू आहे, तसेच त्यांनी आपल्यावरही टीका केली होती, याबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर ते म्हणाले, राज ठाकरे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते कोणाच्या तरी हातचे बाहुले झाले आहेत, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. अशा नकलाकारांच्या कलेचं कौतुकच केलं पाहिजे. भोंगे बंद करण्याचा विषय ते मांडतात. यापेक्षा त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये जावे. त्या ठिकाणी भोंगे बंद झाले का, हे तपासावे. त्याप्रमाणे आम्हालाही सांगावे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा