शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

 मी युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषधच! राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:36 IST

होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.

नागपूर -  होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.  त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात शिवसेना आणि  राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सुरू असलेले वाकयुद्ध अजून भडकण्याची शक्यता आहे. विखे पाटील हे विषारी औषध असल्याचे प्रसिद्धी पत्रक काल शिवसेनेने काढले होते. त्याला उत्तर देताना विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला. विखे-पाटील म्हणाले, "भाजप आणि उद्धव ठाकरे, हे दोघेच या सरकारचे खरे लाभार्थी असल्याचे विधान मी केले होते. सत्य हे कटू असते आणि ते उद्धव ठाकरेंना खुपल्यामुळे त्यांनी मला विषारी औषधाची उपमा दिली आहे. परंतु, ही टीका म्हणजे माझ्या कामाची पावती आहे." यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर विखे-पाटील  यांनी जोरदार टीका केली, "हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला बोंडअळी आणि तुडतुड्याचा रोग आहे.‘बी फॉर बीजेपी’ म्हणजे ‘बी फॉर बोंडअळी’ तसेच ‘टी फॉर तुडतुडा’म्हणजे ‘टी फॉर ठाकरे’ आहे. हे रोग नष्ट करण्यासाठी मी विषारी औषध असणे राज्याच्या हिताचे आहे आणि म्हणून मी या लोकविरोधी सरकारविरोधात विषारी औषधासारखेच काम करीत राहणार,असेही ते म्हणाले.आतापर्यंत ९३ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे आणि भाजप पिकांवरील किडीप्रमाणे असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती.  त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे  यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केली होती.  कापूस, सोयाबीन, धान पिकावरच नव्हे तर राजकारणातही कीड लागली आहे. ते विषारी रसायन असून शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा टोला त्यांनी लगावला होता.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७