बारावीचा विक्रमी टक्का!
By Admin | Updated: June 3, 2014 01:22 IST2014-06-03T01:22:21+5:302014-06-03T01:22:21+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात यंदाचा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे.

बारावीचा विक्रमी टक्का!
>यंदाही मुलींची बाजी : गतवर्षीपेक्षा 1क् टक्क्यांनी वाढ, कोकण पुन्हा अव्वल
पुणो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात यंदाचा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे. राज्यातील नियमित विद्याथ्र्याच्या निकालाची एकूण टक्केवारी 9क़्क्3 टक्के इतकी असून, निकालात यंदाही मुलीच आघाडीवर राहिल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणो (सीबीएसई) बदललेला अभ्यासक्रम आणि 8क्/2क् या पॅटर्नमुळे या वर्षी निकाल वाढला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल 79़95 टक्के इतका होता. राज्यात कोकण विभाग अव्वल असून, मुंबई विभाग शेवटच्या स्थानावर आहे. गतवर्षीपेक्षा 1क़्क्8 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आह़े
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणो, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. सोमवारी दुपारी 1 वाजेपासून ऑनलाइन निकाल पाहण्यास उपलब्ध झाला असला तरी विद्याथ्र्याना गुणपत्रिका 1क् जून रोजी महाविद्यालयात दुपारी 3 वाजता मिळेल़
राज्याचा नियमित विद्याथ्र्याचा एकूण निकाल 9क़्क्3 टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94़85 टक्के लागला असून, मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88़3क् टक्के आहे. मुलांच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल 6 टक्क्यांहून अधिक लागला आहे. (प्रतिनिधी)
शैक्षणिक गुणवत्ता वाढली
राज्याच्या सर्व विभागांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढली असल्याचे इयत्ता बारावीच्या निकालावरून स्पष्ट होते. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94 टक्के लागला. इतर विभागांचे निकाल हे 9क् टक्क्यांच्या घरात आहेत, ही आनंदाची बाब आहे. वेगवेगळे विभाग एकमेकांशी गुणवत्तेच्या पातळीवर स्पर्धा करीत असल्याचे यानिमित्ताने दिसले. शालेय शिक्षण विभागाने दिलेला शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर आदी पावले उचलल्याचा निश्चितच फायदा झाला. सर्व गुणवंतांचे मन:पूर्वक अभिनंदन.
- राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण मंत्री
राज्यातील 7 हजार 782 पैकी 778 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 1क्क् टक्के लागला आहे. त्यात पुणो विभागातील 168 कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर राज्यातील 1क् महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला असून, त्यात औरंगाबाद विभागातील 4 , मुंबई विभागातील 2 आणि लातूर विभागातील 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. -बारावीच्या निकालात भरघोस वाढ/1क्
नागपूरचा अनुराग भारद्वाज राज्यात अव्वल
मुंबई : बारावी परीक्षेत नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुराग अविनाश भारद्वाज हा 637 म्हणजेच 98 टक्के गुण प्राप्त करीत बहुधा राज्यातून अव्वल ठरला आहे, तर नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातील चरिता नित्यानंद मैया 97़23 टक्के (632) गुण संपादन करीत राज्यातून दुसरी ठरली आहे. माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी-बारावीतील सर्वाधिक गुण प्राप्त करणा:या विद्याथ्र्याची यादी प्रसिद्ध करीत नाही़ परंतु ‘लोकमत’च्या विविध वार्ताहरांकडून प्राप्त माहितीनुसार या परीक्षेत नागपूरच्या अनुरागला सर्वाधिक गुण मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नांदेडची चरिता राज्यातून दुसरी आणि मुलींमधून सर्वप्रथम आल्याची माहिती आहे.